सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी
केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…