Headlines

डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलिस महासंचालकांशी भेट:बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्रीवर कारवाईचे आश्वासन

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी मुंबईत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारीसह विविध गंभीर मुद्द्यांवर त्यांनी दाते यांच्याशी चर्चा केली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, मुंबईतील अमली पदार्थ विक्री…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

अखेरचा निरोप:कालिदास महाराज अनंतात विलीन, गुंज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; संभाजीनगरमध्ये कार अपघातात निधन

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंज येथील प.पु. कालिदास महाराज यांच्यावर दुपारी १:३० वाजता गुंज येथील गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांचा जनसागर ओसंडला होता. जवळ जवळ दोन- अडीच हजार भक्त महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. संपूर्ण गावातून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. कालिदास महाराजांचा छत्रपती संभाजीनगर येथील धुळे – सोलापूर…

Read More

मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार:डी-कंपनीच्या हस्तकाचा मुलगा जखमी, हल्लेखोर पसार; पोलिस घटनास्थळी दाखल

मुंबईतील गजबजलेल्या भायखळा परिसरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात समीर शेख नावाचा तरुण जखमी झाला असून, भरवस्तीत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या…

Read More

अमरावती शिक्षकांचे शाळा सुरू करण्याच्या तारखेला आव्हान:मुंबई उच्च न्यायालयात याचिका, 9 जूनला पुढील सुनावणी

अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ही याचिका दाखल केली असून, पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार आहे. विदर्भातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या…

Read More

इन्फ्लुएन्सरचा दावा- वरुण धवन बनावट रिव्ह्यू करत आहे:संतापलेल्या अभिनेत्याने विचारले- व्ह्यूज मिळाले का, क्रिएटर म्हणाली- गरज नाही

वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे अभिनीत ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला. फर्स्ट लुक आल्यानंतर एका इन्फ्लुएन्सरने दावा केला की वरुण धवनची टीम लोकांकडून बनावट रिव्ह्यू करून घेत आहे. याशिवाय इन्फ्लुएन्सरने आणखी अनेक आरोप केले, पण वरुण धवन…

Read More

Pune Steel Businessman Office Firing; Bishnoi Gang Link Discussed

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी फाटा येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एच विकास स्टील या व्यावसायिक आस् . सुदैवाने जीवितहानी नाही गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी कार्यालयाच्या गेटवर आणि परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती…

Read More

टीव्ही पाहिल्याशिवाय म्हैस दूध देत नाही:असा ग्रह जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो; रस्त्यांविना गाव, लोक छतांवर चालतात

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक म्हैस टीव्ही पाहताना दिसत असून, ती मालकिणीने हटवल्यावरही हटत नाही. तर, सौरमंडळात असे दोन ग्रह आहेत जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो. इराणमध्ये एक असे गाव आहे जिथे कोणताही रस्ता नाही, येथे लोक छतांवरूनच चालतात. तिकडे, केरळमध्ये फणसाच्या बियांपासून कॉफी बनवली जात आहे. तर, मध्य प्रदेश उच्च…

Read More

पारा ४१ वर; रस्ते ओस, ३ दिवस उष्णतेची लाट:उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस

प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराच्या तापमानात तांत्रिकदृष्ट्या १ अंशाने घसरण झाली असली, तरी सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी ४२ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ४१ अंशांवर स्थिरावला. मात्र, असे असले तरी अति उष्णतेमुळे तीव्र उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडले होते. रात्रीच्या वेळीही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या…

Read More

वरुडमध्ये प्रशासकीय दिरंगाई; हजारो लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित.:मुदतवाढीसाठी आमदार यावलकरांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची घेतली भेट.

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन धान्य वाटपासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची…

Read More