Headlines

वसमतच्या तहसीलदाराचे निलंबन अन्यायकारक:कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप, नागरिकांची निलंबन मागे घेण्याची मागणी

गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात…

Read More

ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे सुवेंदु अधिकारी येथून उमेदवार; आसाम-केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रचार थांबला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने या जागेवरून सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. ते विरोधी पक्षनेतेही आहेत. सुवेंदू यांनी २ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह त्यांच्यासोबत उपस्थित होते. भवानीपूर व्यतिरिक्त, नंदिग्राममध्येही ममता आणि सुवेंदू यांच्यात लढत आहे, जिथे…

Read More

नवरदेवाच्या वडिलांसह 6 वऱ्हाडींचा मृत्यू:उत्तर प्रदेशमध्ये बसला धडक देऊन त्यावरच ट्रक उलटला; 3 दिवसांनी होते मुलीचे लग्न

उत्तर प्रदेशातील हापुड येथे रविवारी मध्यरात्री दीड वाजता वऱ्हाडींनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली. या अपघातात 5 वऱ्हाडींसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी आहेत. वऱ्हाड गाझियाबादमधील डासना येथून बुलंदशहरमधील गुलावठी येथे गेले होते. बसमध्ये एकूण 13 वऱ्हाडी होते. इतर लोक दुसऱ्या गाड्यांमधून मागे येत होते. लग्नानंतर परत येत असताना बस रस्त्याच्या…

Read More

दशकाच्या अंधाराला लागला अखेर पूर्णविराम:अंजनगाव सुर्जीतील 8 दिवे पुन्हा प्रकाशमान, युद्धपातळीवर दुरुस्ती‎

शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेले तब्बल आठ हायमास्ट दिवे गेल्या दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने शहरात अक्षरशः अंधाराचे सावट पसरले होते. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुख्य रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या समस्येची तातडीने दखल…

Read More

प्राणघातक हल्ला:सिल्लोड शहरात घरात घुसून जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

सिल्लोड कौटुंबिक वादातून व संशयाच्या भरात सासरच्या घरात घुसून जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या हल्ल्यात पत्नी व सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयभवानीनगर येथील समरीन खालेक पटेल (२२) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील आरेफ सत्तार पटेल…

Read More

शुभांगी देशपांडे, अनुराधा काळे यांना आगरकर, दाभोलकर पुरस्कार:महाराष्ट्र अंधश्रद्धेत चाचपडतोय, प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुभांगी देशपांडे यांना आगरकर स्मृती पुरस्काराने, तर अनुराधा काळे यांना डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी चिंता व्यक्त केली की, आगरकर-दाभोलकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडत आहे. प्रा. जोशी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात बुवाबाजी वाढली असून बुद्धीप्रामाण्यवादाची उपेक्षा होत…

Read More

वेळकाढू कारभाराविरोधात महावितरण कार्यालयाला घेराव:नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी

तिवसा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांच्या नेतृत्वात बुधवारी १ जुलैला महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घालत त्यांच्याच दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात…

Read More

कान्समध्ये दुर्लक्ष केल्यावर आलियाचं ट्रोलला उत्तर:म्हणाली- दुःख कसलंय, तुम्ही तर नोटिस केलं; युझरने लिहिलं होतं- कुणी भाव दिला नाही

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ च्या रेड कार्पेटवर दिसली. येथे तिच्या लूकची बरीच चर्चा झाली, पण त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी दावा केला की, आंतरराष्ट्रीय पापाराझींनी आलियाकडे दुर्लक्ष केले. आता आलियाने स्वतः एका ट्रोलला अतिशय शालीनपणे उत्तर दिले आहे. बुधवारी…

Read More

ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे बोलत होते….

Read More

सलमान खानने ‘लोनली’ पोस्टवर स्पष्टीकरण दिले:म्हणाला- लोकांसोबत राहून मी कंटाळतो; आईने विचारले- काय झाले बेटा?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या व्हायरल ‘अलोन’ आणि ‘लोनली’ पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, मी माझ्याबद्दल बोलत नव्हतो. इतक्या मोठ्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये मी एकटा कसा असू शकेन? तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम माझ्यासोबत आहे. त्याने पुढे विनोदी शैलीत लिहिले की, कधीकधी सतत लोकांमध्ये राहून तो थकून जातो, त्यामुळे…

Read More