Headlines

पाकिस्तानशी चर्चा, वांगचुकांशी का नाही- ठाकरे:मुंबईमध्ये उबाठा पक्षाकडून आंदोलन, दिपके यांचे हजारो समर्थक उतरले रस्त्यावर

लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाविरोधातील दडपशाही आणि “नीट’ परीक्षेतील देशव्यापी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ठाकरे पिता-पुत्रांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पोलिस आणि शिवसैनिकांमधील तीव्र बाचाबाचीनंतरही सर्व अडथळे झुगारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाहीरपणे घेरले. उद्धव ठाकरे यांनी थेट पहिल्याच वाक्यात संघप्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले, “अहो भागवत साहेब,…

Read More

निवडणुकांमधील पराभवानंतर आता उद्धवसेना पक्षाची रचना बदलणार:जि. प. गटाऐवजी पं. स. गणस्तरावर विभागप्रमुख

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटनेने नव्याने बांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाला मुळापासून बळकट करण्यासाठी आणि सातत्याने होणाऱ्या पराभवाचा दणका रोखण्यासाठी शिवसेना आता तळागाळात नवे संघटनात्मक बदल केले जात आहेत. या नव्या प्रयोगांतर्गत आता पंचायत समिती गणाच्या पातळीवर एक विभागप्रमुख आणि दोन उपविभागप्रमुख नेमले…

Read More

विमानापेक्षा इमान महत्त्वाचं!:उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आणि फडणवीसांसह विमानप्रवासावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत असताना, त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमानप्रवासापर्यंत विविध मुद्द्यांवर…

Read More

सोहराबच्या भूमिकेवर रणवीर म्हणाला- त्याला फक्त अटेंशन हवे:रजत कपूरच्या चित्रपटात वास्तविक जीवनाशी संबंधित पात्रे, विनय पाठक म्हणाले- बदल आवश्यक आहे

‘एव्हरीबडी लव्हज सोहराब हांडा’ या चित्रपटाबद्दल रजत कपूर, विनय पाठक आणि रणवीर शौरी यांनी दैनिक भास्करशी संवाद साधला. रजत कपूर यांनी चित्रपटात अभिनय करण्यासोबतच तो लिहिला, दिग्दर्शित केला आणि अप्लॉज एंटरटेनमेंटसोबत त्याची निर्मिती केली आहे. त्यांनी सांगितले की सोहराब हांडा हे असे पात्र आहे जे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. रणवीर शौरी आणि विनय पाठक यांनी…

Read More

मराठी साहित्याचा जागर!:नाशिकच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे आयोजन; 30 जुलैपर्यंत प्रवेशिकांचे आवाहन

मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करून ते समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी नाशिकच्या अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने द्विवार्षिक राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी दिली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दर दोन वर्षांनी आठ वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख ₹३,०००…

Read More

सरकार म्हणाले- अनेक मंदिरांमध्ये प्रसादात दारू दिली जाते:न्यायालय हे म्हणू शकत नाही की तिथे दारू देऊ नका; शबरीमाला प्रकरणात सुनावणी

केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात शबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मंदिरांच्या रीतीरिवाजांचा उल्लेख केला. एएसजी नटराज म्हणाले, दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मद्य दिले जाते. उद्या तुम्ही यावर आक्षेप घेऊ शकत नाही की मद्य देऊ नये. एक उदाहरण देताना ते म्हणाले, अनेक मंदिरांमध्ये शाकाहारी भोजन दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार किंवा अंतरात्म्याच्या आवाजावरून मांसाहारी भोजन…

Read More

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या संस्कृतीची झलक:होजगिरी नृत्य, संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी सादर

पुण्यात ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आसामच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. बिहू नृत्याच्या वेगवान लय, तालबद्ध हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने पुणेकरांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली. हा कार्यक्रम भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता. भारती…

Read More

अंगणवाडी सेविकांचे वैजापूरमध्ये आंदोलन:जळगाव येथील सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी‎

तालुक्यात एका गावातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व विनयभंग झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रवीण डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, बाळू काशिनाथ डोंगरे व रवींद्र डोंगरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी…

Read More

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎

. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू…

Read More

तुमच्या नोकरीत पेन्शन नाही का?:वृद्धापकाळासाठी आत्तापासूनच बचत करा, निवृत्ती निधी तयार करा, तज्ञांकडून तपशील समजून घ्या

भारतात निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता खूप कमी आहे. देशात असे लाखो लोक आहेत, जे वेळेत निवृत्तीचे नियोजन करत नाहीत. यामुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. भारतातील आघाडीची व्यावसायिक सेवा फर्म ‘ग्रांट थॉर्नटॉन’ च्या एका सर्वेक्षणानुसार, मोठ्या संख्येने लोक निवृत्तीसाठी पुरेशी बचत करत नाहीत. 2025 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणानुसार, खाजगी क्षेत्रातील सुमारे 50% कर्मचारी निवृत्तीसाठी…

Read More