Headlines

खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा आता वाचला जात आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रक . तपासातील महत्त्वाचे मुद्दे गूढ ‘रिंग मेकर’ घटनास्थळावरून बोटांच्या अंगठीचे माप घेणारी ३५ गोलाकार स्टीलची मापे जप्त…

Read More

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎

कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा…

Read More

‘भारत’ लिहिलेल्या 21 हजार तिळांद्वारे साकारला विठ्ठल:पंढरपुरात दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा शुभारंभ; सूक्ष्म कलाकृती व चित्रनिर्मितीने रसिक मंत्रमुग्ध

सावळ्या विठुरायाच्या नगरीत आजपासून तीन दिवसीय दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ झाला. राज्यभरातील अक्षरप्रेमी कलावंत, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संमेलन परिसर गजबजून गेला आहे . या संमेलनाला पहिल्याच दिवशी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच लांबून आलेल्या विठ्ठल भक्तांनी व कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांसह अक्षरप्रेमी नागरिक, महिला, तरुण…

Read More

विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते लवकरच कारागृहाबाहेर येणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसाठी हा मोठा कायदेशीर दिलासा मानला जात आहे. या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहराजवळील ममुराबाद रस्त्यावरील कोल्हे यांच्या…

Read More

महाराष्ट्रात 'शून्य सावली'चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे…

Read More

राज्याचे एआय धोरण, 1.5 लाख नोकऱ्या:महिला उद्योजकांना सव्वा कोटीचे अनुदान, एआय स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्र राज्याला देशाचे “एआय हब’ बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बुधवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण-२०२६’ चा शासन निर्णय निर्गमित केला. या धोरणांतर्गत तांत्रिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी १.२५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची तरतूद करण्यात आली…

Read More