Headlines

मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार अक्षय कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा…

Read More

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 70 लाखांची फसवणूक उघड:पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये दोघांना केली अटक

पुणे पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशी कॉल सेंटरसाठी प्रकल्प आणि सेटअप उभारून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने तब्बल ७० लाख ८५ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले:आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) दुसरा दिवस होता, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उपोषणात…

Read More

संभाजीनगरात ‘एफएसएसएआय’चे नामांकित हॉटेल्स, मॉल्सवर छापे:पथक 2 दिवसांपासून मुक्कामी, अन्नपदार्थांचे नमुने जप्त

केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) विशेष पथकाने शहरात अचानक धडक मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पथकाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि प्रमुख मॉल्समध्ये छापे टाकून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कारवाईदरम्यान पथकाने थेट हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात जाऊन अन्नपदार्थ, स्वच्छता आणि…

Read More

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना, त्यांनी समाजमाध्यमाद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळत…

Read More

भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचे 49 व्या वर्षी निधन:एक जून रोजी जर्मनीहून परत येत असताना तब्येत बिघडली होती; कॉमनवेल्थ गेम्समध्ये 9 सुवर्णपदके जिंकली

भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांना दिल्लीतील मॅक्स साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 जून रोजी रात्री म्युनिकहून परतताना जसपाल यांची विमानात तब्येत बिघडली होती. तिथे त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली होती. मायदेशी परतल्यानंतर जसपाल यांना दिल्लीतील मॅक्स साकेत…

Read More

Monsoon Reaches 22 States; UP Entry Likely, Rajasthan Hottest at 43°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सात राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशात वादळ आणि पावसामुळे शनिवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 जण होरपळले. शिवपुरीक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून…

Read More

हिंगोलीत वन विभागाची धडक कारवाई:विनापरवाना सागवान लाकडासह टेम्पो जप्त, उमरा फाटा शिवारात तस्करांचा डाव उधळला

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा शिवारात वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १९ सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो अन लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करांमधून खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जंगलामधून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर…

Read More

कुरुक्षेत्रच्या विद्यार्थ्याचा कॅनडात मृत्यू:रात्री झोपला पण सकाळी उठला नाही, दोन वर्षांपूर्वी स्टडी व्हिसावर गेला होता, शिक्षण घेत होता

कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा कॅनडात मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली. कुटुंबाने सरकारकडे मुलाचा मृतदेह परत आणण्याची विनंती केली आहे. युवक सुमारे 2 वर्षांपूर्वी स्टडी व्हिसावर कॅनडाला गेला होता. जिथे सकाळी त्याचा मृतदेह खोलीतून सापडला. मृत विद्यार्थ्याची ओळख लाडवा येथील गजलना गावातील वीरेन रंगा अशी झाली आहे. वीरेन मार्च 2024 मध्ये कॅनडाला…

Read More

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे…

Read More