Headlines

CJI म्हणाले- मला ओरडून चेंबरमधून बाहेर काढले होते:त्याच न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार न्यायिक सेवा मुलाखत सोडली; हसून विचारले, माझा निर्णय योग्य होता का

सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सांगितले की, कसे एका न्यायाधीशांनी त्यांना ओरडून चेंबरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. हा किस्सा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायिक सेवेतील अर्जदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितला. मॅजिस्ट्रेट परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी घेऊन प्रेरणा गुप्ता आपले म्हणणे मांडत होत्या, तेव्हाच सरन्यायाधीशांनी…

Read More

शरद पवारांनी सर्व पवार कुटुंबाला एकत्र बोलावले:DCM सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण; मोदीबागेत जमणार सर्व कुटुंबीय, चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सर्वच पवार कुटुंबीयांना एकत्र बोलावले आहे. या बैठकीचे निमंत्रण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे पवारांनी बोलावलेल्या या बैठकीविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीच्या दिवशी शरद पवार ब्रीच कँडी…

Read More

‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर‎

जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची…

Read More

एअर इंडियाचे दिल्ली-बंगळूरु विमान धावपट्टीला धडकले:लँडिंग दरम्यान अपघात, मागील भागाला ओरखडा आला; प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित

एअर इंडियाचे दिल्लीहून बंगळुरूला जाणारे विमान AI2651 गुरुवारी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीला धडकले. विमानाचा मागील भाग जमिनीला लागला. या घटनेला विमानचालन भाषेत ‘टेल स्ट्राइक’ असे म्हणतात. विमानाची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत, ज्यात त्याच्या मागील भागावर ओरखडे दिसत आहेत. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू सदस्य जखमी झाल्याची माहिती…

Read More

काँक्रीटच्या जंगलामुळे चिमण्यांचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर:‘वाडा संस्कृती’सोबत पाखरेही झाली पोरकी, अहिल्यानगर शहरातील चिवचिवाट हरवला

प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराचा वेगाने विस्तार होत असून जुन्या वाड्यांची जागा टोलेजंग अपार्टमेंट्स आणि फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. मात्र, या सिमेंटच्या जंगलात प्रगती साधली जात असली, तरी निसर्गाचा अविभाज्य भाग असलेली ‘चिमणी’ मात्र शहरातून हद्दपार होताना दिसत आहे. कधीकाळी अंगणात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आता शहराच्या गजबजाटातून दूर जात ग्रामीण भागाकडे स्थलांतरीत झाल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले…

Read More

मोटेगावकरांकडे 10 दिवसआधीच होता NEET चा पेपर:मोबाईल डेटा डिलीट केला; दहा विद्यार्थ्यांपासून 40 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या एम सरची A टू Z माहिती

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC या नामांकित कोचिंग संस्थेची चौकशी सुरू केली असून, संस्थेचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील शिक्षण क्षेत्रात…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी 7500 पानांचे आरोपपत्र सादर:10 आरोपींवर दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा आरोप, 8 दहशतवाद्यांपैकी 5 डॉक्टर

देशाची राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या रेड फोर्ट परिसरातील कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ने ७५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस येथील NIA विशेष न्यायालयात दाखल केलेल्या या आरोपपत्रात १० आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रकरण देशाविरुद्ध रचलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटाचे असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला…

Read More

अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली

भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए…

Read More