प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा:पूर्वसूचनेविना धरणातून पाणी सोडले, ट्रॅक्टरसह 3 कामगार वाहून गेले; दैव बलवत्तर म्हणून बचावले
कोणतीही पूर्वकल्पना किंवा ‘अलर्ट’ न देता धरणातून पाण्याचा विसर्ग करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयंकर प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून अचानक लाखो क्युसेक पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीपात्रात काम करणारे तीन कामगार ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवाने या तिघांनीही वेळेवर किनारा…