नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी
नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत….