Headlines

एअर इंडियाने 6 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान उड्डाणे रद्द केली:23 मार्गांवर कपात, जून ते ऑगस्टचे वेळापत्रक जाहीर; इंधन महाग झाल्याने निर्णय

एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरलाइनने बुधवारी सांगितले की, जून ते ऑगस्ट या कालावधीत 6 आंतरराष्ट्रीय मार्ग रद्द केले आहेत. यात दिल्ली-शिकागो आणि मुंबई-न्यूयॉर्क यांसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, 23 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमानांची संख्या कमी केली आहे. टाटा समूहाच्या एअरलाइन कंपनीने सांगितले की, काही देशांवरून उड्डाणांवर असलेल्या निर्बंधांमुळे आणि…

Read More

प्रवासी सीटखाली दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक:डॅझलिंग लायटिंगचा थाटही नडला, श्रीरामपूर आरटीओची 27 स्लीपर बसेसना 1.45 लाखांचा ऑन द स्पॉट दंड‎

प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे . प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये…

Read More

प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25…

Read More

अखिल भारतीय हेडा संघटनेचे युवकांसाठी 'मिशन 20':तीन वर्षांत जास्तीत जास्त तरुणांना शासकीय सेवेत आणण्याचा प्रयत्न

अखिल भारतीय हेडा (महेश्वरी) संघटनेने युवकांसाठी ‘मिशन 20’ राबविणार असल्याचे सांगितले आहे. या अंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये जास्तीत जास्त तरुणांना शासकीय सेवेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राजस्थानमध्ये अखिल भारतीय हेडा संघटनेच्या चौथ्या सत्राची पहिली कार्यकारी बैठक आणि दोन दिवसीय राजस्थान प्रादेशिक हेडा परिवार मेळावा किशनगड येथील महेश विहार येथे पार पडला. या कार्यक्रमाला…

Read More

भोंदू खरात प्रकरण:रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली…

Read More

बदर समिती अहवालावर हरकती मागवल्याने संताप:एससी उपवर्गीकरणावर प्रकाश आंबेडकर आक्रमक

अनुसूचित जातीच्या (एससी) उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना राज्य सरकारने अवलंबलेली प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करताच हरकती मागवल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “अहवाल तातडीने सार्वजनिक करा, अन्यथा समाजातील असंतोष तीव्र होईल,” असा इशारा…

Read More

राज्यातील 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. माधवी खोडे-चवरे मंत्रालयात सचिवपदी, तर आदित्य जिवने जळगावचे नवे मनपा आयुक्त

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी प्रशासकीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, याअंतर्गत नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून…

Read More

रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विकासकामांदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती काढून टाकण्यात आल्याने त्यांची मुळे पूर्णपणे उघडी पडली आहेत. काही ठिकाणी वृक्ष केवळ मुळांच्या आधारावर उभे…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More

"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….

Read More