Headlines

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, सचिन आहिर हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी शिवसेनेतच प्रवेश केला आहे. आम्ही शिवसैनकाला न्याय देण्याचा प्रयत्नप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात…

Read More

जीआयएस मॅपिंगमध्ये त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीला ३० कोटींचे कंत्राट:सजग नागरिक मंचाची स्थायी समितीकडे फेरविचार करण्याची मागणी

पुणे महापालिकेच्या जीआयएस मॅपिंग प्रकल्पात गंभीर त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीलाच पुन्हा ३० कोटी रुपयांचे मोठे कंत्राट देण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी स्थायी समितीकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. २०१६ मध्ये महापालिकेच्या मिळकतींचे जीआयएस मॅपिंगचे काम ‘सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले…

Read More

हिंगोलीत अवैध सावकारीवर धडक कारवाई:11 खरेदीखत, 9 कोरे बाँड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा येथे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या पथकाने गुरुवारी ता. ९ सकाळी सात वाजता अवैध सावकारीच्या संशयावरून एका घरावर छापा टाकला. यामध्ये ११ खरेदीखत, ९ कोरे बॉण्ड, पाच चिठ्ठा, सात कॅलेंडर व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील…

Read More

करमाळा तालुक्यात 52,591 हेक्टरवर खरीप पेरणी:मका, तूर पेरणीत होणार वाढ, पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांची खोल नांगरणीसह मशागतीची कामे वेगाने सुरू‎

करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला . तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची…

Read More

नागपूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा:शनिवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने ‘हीट वेव्ह’चा इशारा दिल्याने, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही भागांमध्ये उष्णतेची…

Read More

अंतापूर जि. प. शाळेची दुरवस्था; छत कोसळण्याच्या स्थितीत

तालुक्यातील अंतापूर, केसापूर आणि वैसपूर या पुनर्वसित गावांमधील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची कमालीची दुरवस्था झाली असून, विद्यार्थी आणि शिक्षक रोज आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. पावसाचे पाणी थेट वर्गात पडत असल्याने मुले भिजत शिक्षण घेत आहेत. या भीषण परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट वर्गात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून नवीन शाळा इमारतीची मागणी…

Read More

भाजपमध्ये गेलेल्या खासदारांनी पंजाब्यांशी गद्दारी केली- भगवंत मान:म्हणाले- भाजप आमच्या सरकारच्या कामांना घाबरली, हिंमत असेल तर माझ्या घरावर छापा टाका

आम आदमी पार्टी (AAP) चे सात राज्यसभा खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, परदेश दौऱ्यावरून परतलेले मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी आधीही सांगत आलो आहे की भाजपचे पंजाब्यांशी पटत नाही, ज्यामुळे पंजाबी आनंदी होतात, ते खराब करण्याचा भाजप प्रयत्न करते. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा आमचे आरडीएफचे पैसे…

Read More

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने बंगाल SIR वर प्रश्न उपस्थित केले:EC ला विचारले- विजयाचे अंतर 2% आणि 15% लोक मतदान करू शकले नाहीत तर काय होईल?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी SIR वर सुनावणी केली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी निवडणूक आयोगाला विचारले की, जर निवडणुकीच्या निकालांमध्ये विजयाचे अंतर 2% असेल आणि 15% लोक मतदान करू शकले नाहीत तर काय होईल. न्यायालयाने असेही म्हटले की, मतदार अधिकाऱ्यांमध्ये भरडला जात आहे. हा एकमेकांवर दोषारोप करण्याचा खेळ नाही….

Read More

'लव्ह जिहाद'ला 'बाजीराव-मस्तानी'ने उत्तर द्या:मस्तानीला घरी आणणाऱ्या हिंदूला 1 लाखाचे बक्षीस; मिलिंद एकबोटेंचे वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला मी एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील…

Read More