विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळवावे- बोरुडे:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअरविषयक मार्गदर्शन
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य…