![]()
सणासुदीत साखर महाग होणे महागात पडू शकते, हे लक्षात आल्यावर केंद्राने व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला आणखी वेसण घातली. आधी १ ते ३१ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांना ४००० क्विंटलपर्यंत साठ्याची परवानगी होती. १ सप्टेंबर रोजी नवा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार व्यापाऱ्यांना १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर कालावधीत २००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. दरम्यान, ब्राझीलमध्ये अति पावसाने ऊसतोड रखडली, आखातातील युद्धामुळे खनिज तेल महागले. यामुळे साखरेचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कच्च्या साखरेचे भाव १६ टक्क्यांनी वाढून ५५२ डॉलर्स प्रतिटनावर गेले आहेत. केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखर आयातीला परवानगी दिली आहे. ऑक्टोबरअखेर आयात साखर भारतात पोहोचावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, हा कालावधी अत्यंत कमी असल्याने साखर वेळेत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, दरम्यान, महाराष्ट्रात सध्या ६ महिने पुरेल एवढा १८ लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. केंद्रीय पथकाकडून बीडच्या दोन कारखान्यांची तपासणी छत्रपती संभाजीनगर | केंद्रीय पथकाने १ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील लोकनेते सहकारी साखर कारखाना आणि एनएसआय शुगर प्रा. लि., युनिट-३ची तपासणी केली. त्यात लोकनेतेकडे साठा नसल्याचे आढळून आले. तर एनएसआय शुगरच्या युनिट-३ मध्ये ३०.३५ मेट्रिक टन साखरेचा साठा आढळला. केंद्रीय पथकाच्या या तपासणीने इतर कारखान्यांचेही धाबे दणाणले आहे. साखरेची समस्या ‘इस्मा’च्या चुकीच्या अंदाजामुळेच ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ म्हणजे इस्माने देशात सुमारे ३५ दशलक्ष (३५० लाख) टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्ष ३० दशलक्ष टन उत्पादन झाले. एका अत्यंत व्यावसायिक आणि नामांकित संस्थेचा अंदाज का चुकला याची चौकशी व्हावी. साखर कारखान्यातील दर २० टक्के उतरले गत महिन्यात साखर ४० टक्क्यांपर्यंत महागल्यावर सरकारने पावले उचलायला सुरुवात केल्यानंतर आता कारखान्यातच साखरेचे दर २० टक्क्यांपर्यत कमी झाले आहेत. याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसू लागला आहे. देशात साखरेची कमी नाही, त्यामुळे लोकांनी, बड्या खरेदीदारांनीही साठेबाजी करू नये, असे सरकारचे निर्देश आहेत.
Source link
सण गोड करण्यासाठी केंद्राचा निर्णय:व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला वेसण, व्यापाऱ्यांना 2000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही