Headlines

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित…

Read More

जबलपूर क्रूझ दुर्घटना- चौथ्या दिवशी काका-पुतण्याचे मृतदेह सापडले:मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली, मृतांमध्ये ४ मुले आणि ८ महिला

जबलपूरमधील बर्गी क्रूझ अपघातात आज सकाळी 9.40 वाजता कामराज आर. यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यापूर्वी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा 8 वर्षांचा पुतण्या मयूरन याचा मृतदेह सापडला होता. तो त्रिची (तामिळनाडू) येथून आला होता. या अपघातात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता दोन मुलांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी एकाची…

Read More

स्वतंत्र राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांची महाराष्ट्रदिनी निदर्शने:सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी | अमरावती केंद्र सरकारने विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचे परिणाम विदर्भ भोगतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीने सध्या विदर्भ ग्रासलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद तीन नुसार वेगळा विदर्भ देण्यात यावा, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी येथे निदर्शने करुन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. १ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात जबरदस्तीने ढकलण्यात आला. जनतेची…

Read More

अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच…

Read More

‘जय गुरुदेव’चा जयघोष; दिव्यांनी उजळून निघाले यावली शहीद गाव:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव सोहळा, मान्यवरांची हाेती उपस्थिती‎

प्रतिनिधी | अमरावती नजिकच्या यावली शहीद येथे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यांची जन्मभूमी या गावात भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जय गुरुदेव चा निनाद आणि दिव्यांची आरास करण्यात आली. पहाटे ४ वाजता पासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा कार्यक्रम गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व संच यांच्या सादरीकरणाने साजरा झाला….

Read More

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

स्व. सोमेश्वर पुसतकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर:शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

प्रतिनिधी । अमरावती स्थानिक आझाद हिंद मंडळ, अमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाचे कार्याध्यक्ष व मनपातील विरोधी पक्षनेते विलास…

Read More

Class 12th result 90.14 percent; 5.86% increase; Girls win

गतवर्षीच्या तुलनेने यंदा बारावीचा निकाल ५.८६ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे नवा पॅटर्न राबवण्यात आला. प्रसंगी फौजदारी कार्यवाहीची तरतूद होती. त्यामुळे यंदा प्रामुख्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासा . प्रतिनिधी | अकोला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी…

Read More

कर्तृत्व, संस्कृती, शौर्याचा जल्लोष; महाराष्ट्र दिन दिमाखामध्ये साजरा:जिल्हाभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल‎

प्रतिनिधी | अकोला शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्थापनेचा गौरव करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनावर रेडक्रॉस येथे स्वच्छता दूतांचा सन्मान -फोटो अकोला | रेडक्रॉस सोसायटीने…

Read More

गृहमंत्रीच नसरापूर प्रकरणात आरोपी असायला हवेत:1500 रुपये देताय म्हणून बहिणींनी तोंड बंद ठेवावे का? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

“राज्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, कारण गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात खरं तर सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे. किंबहुना, या सरकारचेच ‘एन्काउंटर’ केले पाहिजे,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली….

Read More