संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा
महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, कला ,साहित्य, संस्कृती या सर्व सामाजिक अंगाचा प्रेरणादायी व गौरवशाली ओळख करून देणारा हा पोवाडा होता. अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास चिंतन प्रतिभा शक्तीला अमर शेखांच्या तेवढ्याच दमदार…