संभाजीनगरच्या पाणीटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पाणी वितरण सुरळीत करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; अंबादास दानवेंचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात फक्त 15 ते 16 वेळाच पाणीपुरवठा झाला…