Headlines

"भोंदु गुरू माऊली'चा विशेष तपास, धाराशिवनंतर पंढरीतून तिसरी तक्रार:समाजमाध्यमावरील छबी डिलीट, धाराशिवच्या भक्ताचा नोंदवला जबाब‎

कासव देऊन पाठीमागील पीडा दूर करण्याचा दावा करून अनेक भक्तांची आर्थिक लुट करणारा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली याने अनेकांची फसवणूक करुन आर्थिक लुट केल्याचे प्रकरणे समोर येऊ लागली असून रविवारी दि १० रोजी धाराशिव आणि सोमवार दि.११ मे रोजी पंढरपूरच्या पिडीत भक्तांने आपलीही फसगत झाल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्याची पडताळणी करण्याचे काम…

Read More

वावटळीत पत्रे व दगड पडून महिलेचा मृत्यू‎:वैरागमधील संजय नगरात अचानक घडलेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी, उपचार सुरू‎

वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला…

Read More

बार्शीतील प्रलंबित 2457 प्रकरणे निकाली; 2 कोटींचा महसूल जमा:राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी 78 तर दाखलपूर्व 2379 प्रकरणात तडजोड‎

बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली…

Read More

अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची प्रचंड दुरावस्था:पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा, निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही‎

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ वरील खड्डे आणि दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली असून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. नीरज धोटे…

Read More

weather rajasthan Maharashtra gujarat MP heatwave bihar himachal Uttarakhand rain snowfall

Marathi News National Weather Rajasthan Maharashtra Gujarat MP Heatwave Bihar Himachal Uttarakhand Rain Snowfall भोपाळ/लखनौ/जयपूर/डेहराडून37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम आहे. सोमवारी देशात राजस्थानमधील बाडमेर सर्वात उष्ण शहर ठरले. येथे तापमान 47.3°C नोंदवले गेले. तर जैसलमेरमध्ये तापमान 46.5°C, फलोदीमध्ये 45.6°C, बिकानेरमध्ये 45.3°C आणि जोधपूरमध्ये 44.9°C होते. देशातील इतर…

Read More

मित्राच्या कन्येच्या लग्नाला दिली आर्थिक मदत:”अगस्ति”च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; मैत्रीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली‎

शालेय जीवनातील आठवणी केवळ अल्बममध्ये कैद न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा एक वस्तुपाठ अकोले तालुक्यातील ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’ने घालून दिला आहे. आपल्याच एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी या गटाने ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द . अगस्ती विद्यालयातील १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला आहे. नुकतीच…

Read More

वेरूळ येथील चतुर्विधा मठाला संरक्षण द्यावे:सहायक पोलिस अधीक्षक अग्निहोत्री यांना निवेदन‎

वेरूळ येथे श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणकाळात त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. त्यांच्या स्मरणार्थ वेरूळ येथे चतुर्विधामठ स्थापन करण्यात आला. आठशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठावर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महानुभाव पंथाच्या वतीने सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री…

Read More

ग्रंथदानातून उभारले जाणार ज्ञानालय; नाकोडे विद्यालयाचा अभिनव उपक्रम:जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार वाचनालय‎

ग्रंथदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नाकोडे येथील मविप्र समाजाच्या शाळांनी अभिनव ग्रंथदान अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०० पुस्तके देण्यासाठी २० नागरिकांनी…

Read More

पंतप्रधानांचे बचतीचे आवाहन, महाराष्ट्राचे मंत्री फ्रान्सला जाणार नाहीत:कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार होते; सरकारने म्हटले- पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन दिवस लोकांना इंधन आणि संसाधनांचा कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, जिथे शक्य असेल तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रो, इलेक्ट्रिक बस तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. परदेशी प्रवासापासून दूर राहा. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी घोषणा केली की, ते या…

Read More

संमेलन म्हणजे नाथांची सेवा ही गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात:निफाडमध्ये नवनाथांच्या जयघोषाने दोन दिवसीय भक्तीच्या महाकुंभाची सांगता‎

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व निफाड येथील केंद्राच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात अवघे निफाड ‘नाथमय’ झाले होते. “हे संमेलन म्हणजे नाथांच्या सेवेची सांगता नसून, गावोगावी ही सेवा पोहोचवण्याची ही तर फक्त सुरुवात आहे . वैनतेय विद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथभक्त, दत्तभक्त आणि…

Read More