Headlines

फडणवीस सरकारचा भूमिपुत्रांना मोठा दिलासा:जिल्हा बँक भरतीत 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; ग्रामीण तरुणांसाठी संधी

राज्यातील भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक युवकांना मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरतीमध्ये 70 टक्के पदे त्या जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना…

Read More

Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee

Marathi News National Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee West Bengal Tamil Nadu Assam Kerala Puducherry चेन्नई53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत राजकीय सस्पेन्स अजूनही कायम आहे. TVK प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी शुक्रवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा केला, परंतु…

Read More

खा.लंके पुणे येथील रुग्णालयात दाखल:अन्नातून विषबाधा ‎झाल्याचा संशय‎

निर्जलीकरण आणि अन्नातून विषबाधा झाल्यामुळे खासदार नीलेश लंके यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असतानाही लंके यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला होता, मात्र थकवा वाढल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. तमिळनाडूतील जिंजी किल्ला मोहिमेनंतर कोल्हापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या खा. लंके यांना…

Read More

स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकरला पाच दिवस पोलिस कोठडी:राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; आता वीरकर महाराज अडचणीत

सोलापूर जिल्ह्यात भोंदूबाबांविरोधातील पोलिसांची कारवाई आणखी तीव्र झाली असून माढा तालुक्यातील आढेगाव येथील स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकर याला अखेर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यवसायात प्रगती करून देतो, पैशांची भरभराट घडवतो, अशा प्रकारची आमिषे दाखवत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप वीरकर याच्यावर करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी त्याच्यासह त्याचा भाऊ विकास वीरकर यालाही अटक केली होती. या…

Read More

11 शाळांचा निकाल 100 टक्के:दर्यापूर तालुक्याचा 92.83 टक्के निकाल; 2139 विद्यार्थी झाले उत्तीर्ण, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाकडून स्वागत‎

माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी आँनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात दर्यापूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. परिक्षेत बसलेल्या २३२३ विद्यार्थ्यांपैकी २१३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आदर्श हायस्कूल, दर्यापूरचा निकाल १०० टक्के लागला असून प्रबोधन विद्यालयाने ९५.४९ टक्के निकाल मिळवला आहे. दारापूर हायस्कूल, दारापूरचा निकाल ८९.३६…

Read More

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत हरले अमेरिकेतून परतलेले अनंतन:लिहिले- एका आठवड्याच्या निवडणूक पैशांनी 4 वर्षांच्या खऱ्या सेवेला हरवले

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत वासुदेवनल्लूर जागेवर भाजप उमेदवार अनंतन अय्यासामी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना डीएमकेच्या ई. राजा यांनी सुमारे 6500 मतांनी हरवले. ही जागा एससी उमेदवारांसाठी राखीव होती. अनंतन राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेत काम करत होते. त्यांनी राजकारणात येण्यासाठी आपले यशस्वी तंत्रज्ञान करिअर आणि रिअल इस्टेट व्यवसायही सोडला होता. त्यांचे म्हणणे आहे की, जनसेवेचे स्वप्न…

Read More

"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका‎

रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

नगर परिषदेच्या वतीने 256 प्रगणकांना प्रशिक्षण:अचलपूर-परतवाडा शहरात जनगणनेची तयारी, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन‎

भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने अचलपूर नगर परिषदेच्या वतीने अचलपूर-परतवाडा शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २५६ प्रगणकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जात असल्याने प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन सुरू केले आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी…

Read More

प्रगती:हातरुण ग्रामपंचायतीमध्ये नोंदींसह विकासकामांची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माेहिम

बाळापूर तालुक्यातील हातरुण ग्राम पंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची समीक्षा करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या निरीक्षण समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफलाइन व ऑनलाइन नोंदींची सखोल तपासणी केली. गावामध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीकडून आलेल्या या निरीक्षण समितीत अध्यक्ष एच. बी. गौतम( गट…

Read More

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More