फडणवीस सरकारचा भूमिपुत्रांना मोठा दिलासा:जिल्हा बँक भरतीत 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; ग्रामीण तरुणांसाठी संधी
राज्यातील भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक युवकांना मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरतीमध्ये 70 टक्के पदे त्या जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना…