पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक
तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील…