Headlines

तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल

पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

वांगीत विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या:सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎

तालुक्यातील वांगी येथील एका शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. गणपत भीमराव काकडे (५०, रा. वांगी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणपत काकडे हे आपल्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना विषारी औषधाची बाधा झाल्याचे लक्षात येताच, गावातील संतोष काकडे…

Read More

लग्नसराईत लालपरी हाऊसफुल्ल; पाचोरा बससाठी चार तासांची प्रतीक्षा:सिल्लोड-धुळे, अमळनेर ,कन्नड-पाचोरा, जळगाव बससाठी साकडे‎

लग्नसराईची लगबग सुरू असून, रोजच्या शुभमुहूर्तांमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी घाटनांद्रा बसस्थानकावर हाऊसफुल्ल धावत आहे. सिल्लोड–घाटनांद्रा ते सिल्लोड–पाचोरा मार्गावरील बसेस रोज प्रवाशांन भरून निघत आहेत. दरम्यान, पाचोरा बससाठी चार तासांची वाट पहावी लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर सकाळी एकमेव सिल्लोड–पाचोरा बस सुरू आहे. दररोज…

Read More

मनपा, जिल्हा परिषदेत उद्धवसेनेला अपयश तरी संभाजीनगरला उमेदवारी:अंबादास दानवे यांच्याकडे दोन्ही निवडणुकांची होती जबाबदारी

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील आव्हानात्मक परिस्थितीनंतरही उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. संभाजीनगरातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटलेले असताना, मराठवाड्यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्ह . सातत्याने आंदोलनांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न लावून धरल्याने दानवे यांची दावेदारी प्रबळ ठरली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विखुरलेल्या…

Read More

जायकवाडीचा 20 टीएमसी गाळ उपसणार:संभाजीनगरला 10 वर्षे पुरणारा साठा होणार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सरकारचा निर्णय; शासनाचा खर्च वाचणार

जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा २० टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे. राज्य शासनाचे हे महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मराठवाड . जायकवाडीची मूळ साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. मात्र १९७६ पासून एकदाही गाळ न काढल्याने धरणात आता २० टीएमसी चिखल साचला…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात 8लाखांवर मतदारांचे मॅपिंग नाही; 10मेपूर्वी यादीतून नाव कमी:मुस्लिमबहुल भागात मॅपिंग सर्वाधिक, तीनही मतदारसंघ 60 टक्क्यांच्या आत

जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक विभागाकडून काम सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर होणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हीजन (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सध्या २००२ सालच्या मतदार यादीशी सध्याच्य . ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नव्हते, अशा मतदारांच्या आई-वडिलांच्या नावाशी सध्याची नोंद जुळवली जात आहे. विवाहित मुलींचे नाव त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणच्या नोंदीनुसार…

Read More

बनावट नोटांचा वाद; पडेगावच्या एकाचे अपहरण; येवल्यात भक्त निवासात डांबले:15 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचे दाखवले आमिष

पडेगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला येवला येथे डांबून ठेवल्याच्या प्रकरणात बनावट नोटांच्या रॅकेटचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना अटक करत पीडिताची सुटका केली. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे व्यवहार करणारे संघटित जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य मध्यस्थ फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन…

Read More

साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता:जमिनीवरील बांधकाम स्वतंत्र घटक असून कायदेही भिन्न असल्याचा युक्तिवाद

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात उबाठा नेते अनिल परब यांना खेड न्यायालयाने दिलासा दिला आहे. ६ मे रोजी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी परब यांच्यासह सर्व संशयित आरोपींची निर्द . तांत्रिक युक्तिवाद ठरला निर्णायक बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयात मांडले की, “जमीन आणि त्यावरील…

Read More

राज्यातील शिक्षकांसाठी आता दरवर्षी 50 तासांचे प्रशिक्षण असेल अनिवार्य:राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतुदींनुसार आता राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे ही या प्रशिक्षणाची राज्यस्तरावरील मुख्य संस्था असेल. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रशिक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, जेणेकरून…

Read More