Headlines

आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे….

Read More

NHRC Seeks Report from NMC, Maharashtra Govt

महाराष्ट्रातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एमबीबीएस विद्यार्थ्यांकडून कथितरीत्या बेकायदेशीर आणि अतिरिक्त फी वसुली करणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे अडवून ठेवणे, आर्थिक व मानसिक छळ आणि नियामक संस्थांची कथित निष्क्रियता यासारख्या गंभीर आरोपों . या प्रकरणी आयोगाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC), महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. हे प्रकरण…

Read More

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात आले, एका महिलेचा मृत्यू झाला होता

हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाच्या विशेष शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित आहे, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 (A11) बनवण्यात आले आहे. न्यायालयाने…

Read More

तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले!:महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, फुटलेल्या खासदारांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून अधिकृत व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र असे असूनही या 6 पैकी एकाही खासदाराने पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. बैठकीकडे…

Read More

तहानलेल्या ठाण्याचं पाणी 'ॲमेझॉन'च्या घशात!:मेगा डेटा सेंटरवरून जितेंद्र आव्हाडांचा पालिकेवर हल्लाबोल, टीडीआरनंतर आता नवा घोळ?

ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर घोटाळ्यावरून आधीच वनविभागासह पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच आता पालिकेच्या आणखी एका नव्या आणि वादग्रस्त निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ‘ॲमेझॉन’चा मेगा डेटा सेंटर प्रकल्प…

Read More

नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई:34 लाखांच्या गांजासह दोन तस्कर ताब्यात, ओडिशा कनेक्शन उघड

नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३४ लाख ७१ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. आरपीएफच्या गुन्हे शाखेचे पथक प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर गस्त घालत असताना, त्यांना दोन व्यक्ती मोठ्या ट्रॅव्हल बॅगांसह संशयास्पदरीत्या…

Read More

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी 22 जून रोजी विशेष कॅम्प:न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या महसुली, न्यायिक आणि अर्धन्यायिक प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता सासवड प्रांत कार्यालयात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा कॅम्प होणार आहे. या कॅम्पमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत सुमारे…

Read More

दिग्दर्शक राघवेंद्र यांनी अभिनेत्री कीर्ती आणि कृतीचा हात ओढला:सोशल मीडियावर ट्रोल झाले; अभिनेत्रीच्या कमरेवर हात ठेवून वादात सापडले होते

तेलुगु सिनेमाचे ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांचा हात पकडून ओढल्याबद्दल ट्रोल होत आहेत. खरं तर, हैदराबादमध्ये दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या नवीन चित्रपटाच्या लॉन्चवेळी 84 वर्षीय राघवेंद्र राव उद्घाटन शॉटचे दिग्दर्शन करत होते. यावेळी ते अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांचा हात पकडून त्यांना आपल्याकडे ओढताना दिसले. सोशल…

Read More

सूक्ष्म, लघु उद्योगांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान:मुख्यमंत्री सल्लागार कौस्तुभ धवसे यांचे प्रतिपादन; एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर चर्चा

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे मोठे योगदान आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी व्यक्त केले. लघु उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठबळाशिवाय मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेशातर्फे ‘महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम…

Read More

11 वर्षांपासून फरार नक्षल समर्थक आरोपीला अटक:बापू जनगम गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नडीकुडा गावातून घेतले ताब्यात

गडचिरोली पोलिसांनी ११ वर्षांपासून फरार असलेल्या एका नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या अभिलेखावरील ग्राम रक्षक दल (जी.आर.डी.) या यादीत समाविष्ट असून, नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी संबंधित होता. जनगम हा दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी…

Read More