Headlines

'मै वापस आऊंगा' चित्रपटाचे पाकिस्तानकडून कौतुक:पाकिस्तानी चित्रपट निर्माते म्हणाले – फाळणीचे दुःख इम्तियाज अलीने सुंदरपणे दाखवले

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर बनलेला दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट पाकिस्तानकडूनही कौतुकास पात्र ठरला आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट निर्माता उमर नासिर अली यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक करत याला एक अत्यंत सुंदर आणि सखोल भावनिक चित्रपट म्हटले आहे. उमर नासिर यांच्या मते, हा चित्रपट त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण ते स्वतःही…

Read More

विप्लव बाजोरिया प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी:विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला लक्ष

विधान परिषद निवडणुकीतील विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज, १७ जून रोजी सुनावणी होणार आहे. मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजोरिया यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत जोडलेले शपथपत्र अर्धवट असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज…

Read More

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर गुरुग्राममध्ये FIR:'बिर्याणीचे 370 वसूल करणार' प्रकरणात कारवाई; विधान करणारा वेब डेव्हलपर, स्टोअर मालकाची नावेही समाविष्ट

‘बिग बॉस 19’ चे माजी स्पर्धक आणि स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये ‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केली आहे. डीएलएफ (DLF) फेज-2 पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे, वेब डेव्हलपर हिमांशू जांगडा आणि गुरुग्राम येथील ‘द लाफ स्टोअर’च्या…

Read More

एअर इंडियाने 'बेसिक' भाडे श्रेणी सुरू केली:मोफत जेवण मिळणार नाही, चहा-कॉफी मोफत मिळेल; निवडक देशांतर्गत मार्गांवर चाचणी सुरू

एअर इंडियाने निवडक देशांतर्गत मार्गांवर नवीन ‘बेसिक’ भाडे श्रेणी सुरू केली आहे. ज्या अंतर्गत प्रवाशांना कमी किमतीत प्रवास करण्याचा पर्याय मिळेल. इकोनॉमी क्लासच्या तिकिटात मोफत जेवण समाविष्ट नसेल, तथापि प्रवाशांना मोफत चहा किंवा कॉफी दिली जाईल. एअरलाइनने एका निवेदनात सांगितले की, हे भाडे सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे, जे कमी खर्चात प्रवास करू…

Read More

पार्वतीनगर जलवाहिनी दुरुस्ती दुसऱ्या दिवशीही सुरू:२५ हजार नागरिकांना बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता

अमरावती: पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारपासून सुरू झालेले दुरुस्तीचे काम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिलेल्या माहितीनुसार, या जलकुंभाशी संबंधित सुमारे २५ हजार नागरिकांना बुधवार, १७ जून रोजी पाणी मिळण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वर यासह परिसरातील अनेक भागांतील नागरिकांना…

Read More

"ही कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली योजना", राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप:जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफीची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या चांदूर रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट…

Read More

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सर्व सेवा ठप्प:अमरावतीत कार्यालयासमोर निदर्शने; राज्यभरातील 945 कर्मचारी सहभागी

मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अमरावती येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सर्व सेवा मंगळवारपासून ठप्प झाल्या आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी नागरिकांना कोणतीही कागदपत्रे किंवा सेवा मिळाली नाही. शासनाने या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांसह सामान्य नागरिकांकडूनही होत आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आरटीओ कार्यालयासमोर शासनाविरुद्ध निदर्शनेही…

Read More

उपवर्गीकरण विरोधात तिवस्यात बैठक, 17 जूनच्या मोर्चात सहभागाचा निर्धार:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार महामोर्चा

तिवसा येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या उपवर्गीकरण निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच, १७ जून रोजी अमरावती येथे आयोजित महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. रहिवाशांनी उपवर्गीकरण हे आरक्षणाविरुद्धचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांना धक्का पोहोचत असल्याचा…

Read More

'तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या':माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत…

Read More

'गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार':जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा…

Read More