Headlines

वेलकम पॉइंटवर खासगी बसेसमुळे होणाऱ्या कोंडीने सर्वसामान्य बेजार:थांब्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी‎

नागपूरकडून शहरात येतानाचे शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘वेलकम पॉईंट’ परिसर सध्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या थांब्यांमुळे निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्जुन नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन सादर केले. तसेच सात दिवसांत…

Read More

शहरामध्ये वादळी पावसाचे थैमान; युद्धपातळीवर मदतकार्यास सुरूवात:आयुक्त वर्षा लड्डा यांनी केली पाहणी; जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न

शहरात सोमवार, ८ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही भागांत वाहनांवर झाडे कोसळली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्या. गंभीर धोका निर्माण झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीची…

Read More

'बिर्याणीचे 370 रुपये वसूल करेल' म्हणणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली:प्रणित मोरेच्या शोची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंपनीची कारवाई

22 वर्षीय वेब डेव्हलपर हिमांशू जांगडाला गुरुग्राममधील स्टारविक डिझाइन या कंपनीतून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीवर झालेल्या विरोधामुळे ही कारवाई करण्यात आली. हा वाद स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या गुरुग्राममधील लाईव्ह क्राउड-वर्क कॉमेडी शोदरम्यान सुरू झाला. शोमधील संवादादरम्यान, जांगडाने एका डेटिंग अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, त्याने एका महिलेवर सुमारे…

Read More

शिवराज्याभिषेकदिनी तिवसा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश:आ. राजेश वानखडे यांच्या हस्ते वृक्षारोपण; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन‎

सध्याच्या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात स्वच्छ, निरोगी, हरित पर्यावरणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक . तिवसा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. राजेश वानखडे यांच्याहस्ते श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रस्तावित जागेवर (श्रीजीत मंगल कार्यालयाजवळ) वृक्षारोपण करण्यात आले….

Read More

Adani Acquires Intellismart for ₹3,050 Cr; Becomes Indias Largest Smart Meter Firm

Marathi News Business Adani Acquires Intellismart For ₹3,050 Cr; Becomes Indias Largest Smart Meter Firm मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (एईएसएल) ने इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विकत घेतली आहे. हा व्यवहार एकूण 3,050 कोटी रुपयांना झाला आहे. या अंतर्गत एईएसएलला इंटेलिस्मार्टची संपूर्ण 100% भागीदारी मिळेल. इंटेलिस्मार्ट ही भारतातील प्रमुख स्मार्ट मीटरिंग कंपन्यांपैकी एक…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरुन मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी…

Read More

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत…

Read More

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

श्रीराम व हरिहर संस्थानची 12 एकर जमीन हडपण्याचा घाट:संस्था अध्यक्षांची महसूलकडे तक्रार, महामार्गावर माेक्याची जागा‎

. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हे प्रकरण सध्या बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी अकोल्यातील भूखंड माफियांची टोळी चर्चेत आली आहे….

Read More

‘अपघात मुक्त अकोला’साठी 46 ठिकाणी नाकाबंदी केंद्र:पोलिस अधीक्षक कार्यालयात रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय‎

जिल्हा पोलिस व संबंधित विभागांच्या वतीने मंगळवारी ९ जून रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात व रस्ता सुरक्षा विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात अपघात कमी करण्यासाठी ‘अपघात मुक्त अकोला’ हे अभियान राबवण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यामध्ये दोन सत्रांत ४६ ठिकाणी नाकाबंदी केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची…

Read More