Headlines

मोठी बातमी:शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेतला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; मात्र आचारसंहितेमुळे घोषणा नाही

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, याबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने…

Read More

भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशन नियम बदलले:180 दिवस पूर्ण होण्यापूर्वी नोंदणी करता येईल; ऑनलाइन अपीलचा पर्याय मिळाला

केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या नोंदणी आणि अपीलशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. गृह मंत्रालयाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (सुधारणा) नियम, 2026 ची अधिसूचना जारी केली. नवीन नियमांनुसार, परदेशी नागरिक आता 180 दिवस पूर्ण होण्यापूर्वी कधीही नोंदणी करू शकतील. तसेच, ऑनलाइन अपीलचा पर्यायही देण्यात आला आहे. यापूर्वी, भारतात 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर परदेशी नागरिकांना 14 दिवसांच्या आत…

Read More

मोबाईलच्या दुनियेत हरवताना मनमोहन श्रीकृष्णाला विसरू नका:रेवतीनंदन दास यांचे आवाहन, शुद्ध बुद्धी भगवंताच्या चरणी समर्पित करा‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर आजचा माणूस मोबाईलच्या आभासी दुनियेत इतका हरवून गेला आहे की, तो मनमोहन श्यामसुंदरला विसरला आहे. आपली बुद्धी शुद्ध आणि पवित्र आहे, ती या जन्मातच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. वसुदेव-देवकीसारखे मन आणि बुद्धी देवाच्या चरणी लावली, की जीवनातील सर्व अंधःकार दूर होईल, असे आवाहन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन…

Read More

रोहित पवारांची शिंदे-अजित पवार गटावर टीका:म्हणाले- दात नसलेले वाघ फक्त गुरगुरतात; तिकिटांसाठी भांडता, शेतकऱ्यांसाठी का नाही?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावे, असे मत…

Read More

विधान परिषदेत अर्ज भरताना महायुतीत बंडखोरी:भाजप आणि शिवसेना नेत्यांशी समन्वयाची चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीमधल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भात अर्ज भरले असतील तर त्या…

Read More

23 राज्यांत वादळी पाऊस, उष्णतेपासून दिलासा:राजस्थानच्या जोधपूर-उदयपूरमध्ये रस्ते पाण्याखाली गेले; 2-3 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल

देशातील 23 राज्यांमध्ये जूनची सुरुवात उष्णतेपासून दिलासा घेऊन आली. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि बिहारच्या अनेक भागांमध्ये पाऊस, वादळ आणि गारपीट झाली. यामुळे तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले गेले. राजस्थानच्या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. उदयपूरच्या गोगुंदा येथे रुग्णालयाबाहेर पाणी साचले. जोधपूरच्या पिपाड शहरात पावसानंतर रस्ते तलावासारखे दिसू लागले. पालीच्या घाणेरावमध्ये रस्त्यांवर नदीसारखे…

Read More

अहिल्यादेवींचे कार्य जगभरात गौरवास्पद – प्रांजल चिंतामणी:जामखेड नगर परिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

प्रतिनिधी | जामखेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जामखेड तालुक्याला लाभला आहे. अशा महान भूमीत सामाजिक व राजकीय कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्यातून मिळते, हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते जगभरात गौरवाने ओळखले जाते. त्यांनी पाणवठे, पाणीसाठे, धर्मशाळा, उद्योग-व्यापार आणि अन्नछत्रांच्या माध्यमातून समाजकल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्याच प्रेरणेने जामखेड…

Read More

स्वभांडवलावर चालणाऱ्या पोस्टल पतसंस्थेतर्फे पालवे, कुमटकर या भूमीपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान:रतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान

प्रतिनिधी |अहिल्यानगर स्वभांडवलावर चालणाऱ्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे जिल्ह्याच्या मातीतून घडलेल्या आणि भारतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून सध्या प्रवर अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले वंजारवाडी (ता. नेवासे) येथील विकास पालवे आणि खातेंतर्गत परीक्षेत यश मिळवून वरिष्ठ पोस्टमास्तर पदाची…

Read More

खरीप पूर्व नियोजन व हुमणी अळी नियंत्रण मेळावा:टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न‎

प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

दिल्लीत 8 जून रोजी I.N.D.I.A ब्लॉकची बैठक होण्याची शक्यता:राहुल, ममता आणि अखिलेश यांच्यासह 15 पक्षांचे नेते येऊ शकतात; एकजुटीवर चर्चा

विरोधी पक्ष आघाडी इंडिया (I.N.D.I.A) ब्लॉकच्या वरिष्ठ नेत्यांची 8 जून रोजी दिल्लीत बैठक होऊ शकते. न्यूज एजन्सी PTI शी संबंधित सूत्रांनुसार, बैठकीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होऊ शकतात. या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा सामना करण्यासाठी आणि विरोधी…

Read More