Headlines

स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई‎

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे….

Read More

झाडे लावा, प्लास्टिक टाळाचा गजर; शाहू विचारांनी दुमदुमले केडगाव:महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात मिरवणूक; 110 गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप‎

राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर . यानिमित्त विद्यालयाच्या वतीने केडगाव ते शाहूनगर परिसरात भव्य जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि मावळ्यांची…

Read More

Indias Operation Amistad for Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs

Marathi News National Indias Operation Amistad For Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ज्येष्ठ IPS अधिकारी महेश दीक्षित इंटेलिजेंस ब्युरोचे संचालक असतील 25 जून रोजी केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक…

Read More

साईनगरीचे आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाची नालेसफाई:गटारसफाई अन् फॉगिंग मोहीम, शिर्डीला अव्वल ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- आरोग्य सभापती गोंदकर‎

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात पावसाळा सुरू होताच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते, नाले आणि गटारी तुंबून नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच डासजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी शिर्डी नगर परिषदेने आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरभर नालेसफाई, गटारसफाई आणि औषध फवारणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ…

Read More

ग्राऊंड रिपोर्ट:कुरनूर धरणावरील वीजपुरवठा केला बंद; पाऊस अन् वीजही नाही, शेतकरी संकटात

प्रतिनिधी | अक्कलकोट पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पाणी वापराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम प्रकल्प तसेच पाटबंधारे तलावावरील कृषीपंपांना विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी होणारा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी आणि पाणीसाठ्याचे नियोजन सुरळीत…

Read More

खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे लक्ष

ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या विदर्भ दौऱ्याची पहिली जाहीर सभा आज सकाळी १० वाजता यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बंडखोरांना उत्तर आणि पुढील रणनीती यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय…

Read More

मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त:गोरेगावमधून 3.75 कोटींचे हेरॉईन जप्त, 20 वर्षीय तरुण गजाआड

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Narcotics Cell) गोरेगाव परिसरात एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५० ग्राम उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपये आंकी गेली आहे. या हाय-प्रोफाईल ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी २० वर्षांच्या एका तरुणाला अटक केली आहे….

Read More

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हा . या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे…

Read More

महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे:पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पुण्यासहित राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार आणि रविवारी (२७ व २८ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असेल, असा अंदाज वर्तवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात…

Read More

मेळघाटात पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांनाही सुरुवात:बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद- परिसर चिंब भिजला‎

अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मेळघाटातील बळीराजासाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावत परिसराला चिंब भिजवले. कडक उन्हामुळे कोरडी पडलेली जमीन आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावला आहे. पहिल्या पावसाच्या सरींनी मेळघाटातील शेतशिवारात नवचैतन्य निर्माण झाले असून आता खरीप हंगामातील…

Read More