Headlines

अभय वर्माला शाहरुखच्या किंगमध्ये मिळाली संधी:'मुंज्या'नंतर स्वप्ने मोठी झाली; शाहरुखचा सल्ला- मन लागेल, तिथेच काम करा

‘मुंज्या’च्या यशानंतर अभय वर्मासाठी प्रसिद्धीसोबत जबाबदारीही वाढली आहे. ते म्हणतात की, यशामुळे त्यांची भूक कमी झाली नाही, उलट स्वप्ने आणखी मोठी झाली. शाहरुख खानसोबत ‘किंग’मध्ये काम करणे त्यांच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. दैनिक दिव्य मराठीशी खास बातचीत करताना अभयने आपल्या करिअरबद्दल, ‘मुंज्या’च्या यशाबद्दल, वाढत जाणाऱ्या स्वप्नांबद्दल आणि शाहरुख खानकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल सांगितले. प्रश्न: ‘मुंज्या’च्या यशानंतर…

Read More

दोन दशके वाट पाहिली; 95 किमी चालत सरकारला विचारणार जाब:अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्यासाठी संजय काळेंचा सावळीविहीर ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास‎

अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी सावळीविहीर फाटा येथून अनोख्या पायी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे ९० ते ९५ किलोमीटरचा प्रवास करून ते अहिल्यानगर ज . पहिल्या दिवशी सावळीविहीर फाटा ते राहाता असा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून काळे छत्रपती शिवाजी चौकात पोहोचले. यावेळी…

Read More

विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग; इनरव्हीलने दिली साधनांची साथ:दोनदा शहरातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ओंकारनगर शाळेला साहित्य भेट‎

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ओंकारनगर प्राथमिक शाळेला इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने बागकामाचे विविध साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये खुरपे, टिकाव, फावडे, कुऱ्हाड, पा . ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे व सहशिक्षिका वृषाली गावडे हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षी शाळेच्या परसबागेत विविध भाज्यांची लागवड…

Read More

साईनामाचा गजर अन्‌ सच्चरित्राचे पठण; केडगावात भक्तीचा उत्सव:श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर‎

केडगावच्या बँक कॉलनी परिसरातील श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमांचीही पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. काकड आरती, दुग्धाभिषेक, महापूजा, साई सच्चरित्र पारायण, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरासह ३ . सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी राजू सातपुते यांच्या हस्ते श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे विधिवत पूजन करून कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. श्री साई…

Read More

शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा‎

श्रीरामपूर शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पुढील काळात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

Read More

‘माती वाचवा, पाणी वाचवा; भविष्य वाचवा’चा विद्यार्थ्यांचा जागर:मृद व जलसंधारण सप्ताहात भाग्योदय विद्यालयात ; वृक्षदिंडी, रॅलीसह विविध उपक्रमांना प्रतिसाद‎

माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढीचे जीवन सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मृद व जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाची चळवळ घराघरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जलसंधारण विभाग . भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडी, जनजागृती रॅली,…

Read More

विद्यार्थ्यांची सुरक्षा बसचालकांची जबाबदारी:गणूरच्या होरायझन अकॅडमीत आरटीओ अमोल पवार यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर चालक आणि वाहकांचीही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय बस चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेकिंग टाळावे आणि मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ती खबरदारी घेत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मालेगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमोल पवार यांनी केले. मविप्र संचलित गणूर येथील…

Read More

कीर्तन सप्ताहाने मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो:मानूरला संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुरूदेव महाराजांचा उपदेश‎

भगवंताची अंतःकरणापासून भक्ती करणारे आणि वारकरी संतांचा ध्यास बाळगणाऱ्या वैष्णवांची भेट म्हणजेच आयुष्याचे सार्थक होय. अशा संतजनांच्या आलिंगनाने मानवी जन्म सुफळ होतो. कीर्तन सप्ताहाने आपापसातील मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो, असा उपदेश ह.भ.प. गुरुदेव महाराज यांनी केला. मानूर येथे कीर्तन सप्ताहात, दादाजी जगन्नाथ बोरसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष कीर्तनसेवेत ते बोलत होते….

Read More

कंगनाशी संबंधित प्रश्नावर तापसी पन्नू भडकली:म्हणाली- तुम्ही प्रश्न विचारणे बंद कराल, तेव्हाच वाद संपेल; कंगनाने 'स्वस्त कॉपी' म्हटले होते

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कंगना रनौतशी संबंधित प्रश्न विचारल्यावर भडकली. अलीकडेच कंगनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे तापसीवर तिच्या संगोपनाची आणि आई-वडिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला होता. यावर मीडियाशी बोलताना तापसी म्हणाली की, जेव्हा लोक आणि मीडिया तिला या मुद्द्यावर प्रश्न विचारणे थांबवतील, तेव्हा हा वाद आपोआप संपेल. तापसी तिच्या आगामी चित्रपट ‘गांधारी’च्या प्रमोशनच्या निमित्ताने बोलत होती….

Read More

विद्यार्थिनींनी जवानांसाठी विणला मायेचा धागा‎:प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी गुंफला जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर‎

देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांप्रती आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या घरातील भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशीही आपले भावनिक नाते…

Read More