'उपभोग-आधारित वृद्धी' भारतासाठी आवश्यक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन:पुण्यात एसबीआयच्या अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले प्रतिपादन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुण्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘उपभोग-आधारित वृद्धी’ कायम राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पुण्याच्या खराडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) महाराष्ट्र सर्कलच्या अत्याधुनिक स्थानिक मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताचा आर्थिक विस्तार प्रामुख्याने शेती आणि देशांतर्गत क्रियाकलापांवर आधारित असावा, जो जागतिक बाजारपेठांच्या…