महाडच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष; अभ्यासक्रमात समावेश करा:मार्च 1927 मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर केलेला सत्याग्रह मानवमुक्तीसाठीचा लढा हाेता
मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पुकारलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. सरंजामशाहीने हिरावून घेतलेली मानवी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी महाडमध्ये झालेल्या दोन परिषदांनी केवळ अस्पृश्यांच्याच नव्हे, तर भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांच्या त्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करणे आणि हा इतिहास…