भाऊसाहेबांच्या कार्यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले- प्रा. डॉ. तायडे:जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास प्रतिसाद
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्याद्वारे झालेल्या वर्तमानातील प्रगतीचा आढावा घेतल्यास भाऊसाहेबांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारे आहेत. समाज सुधारण्याची त्यांची तळमळ आजही अंतर्मुख करणारी आहे. असे मत प्रा. डॉ. प्रकाश तायडे यांनी येथे व्यक्त केले. येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनावर…