Headlines

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:"मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात' दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यापासून सुभाष चौधरी अटक…

Read More

जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात‎

एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. “हा उपक्रम आपली समृद्ध परंपरा जपणारा असून जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव आहे,” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

Read More

अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता‎

श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ,…

Read More

संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर

“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार:एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल. इतर कोणताच प्रादेशिक पक्ष राहणार नाही, या दृष्टीने शिवसेना फोडली, त्यासाठी यंत्रणेचा वापर केला, पासवान यांचा पक्ष तसाच फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ:74,400च्या पातळीवर, निफ्टीही 50 अंकांनी वाढला; ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 100 अंकांच्या वाढीसह 74,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,400 च्या पातळीवर आहे. आज ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारातही घसरण काल अमेरिकन बाजारात घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी काल ५,६१७…

Read More

49,965 ha in Madha taluka. Kharif target; Cultivation work in final stage, Rabicha taluka turned towards Kharif due to Sina-Madha lift irrigation

Marathi News Local Maharashtra Solapur 49,965 Ha In Madha Taluka. Kharif Target; Cultivation Work In Final Stage, Rabicha Taluka Turned Towards Kharif Due To Sina Madha Lift Irrigation कुर्डुवाडी2 तासांपूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, शेतांची नांगरणी आणि मान्सूनपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. बळीराजा सध्या पेरणीयोग्य…

Read More

IMDचा दावा- मान्सूनच्या आगमनाला 10 तास बाकी:केरळमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये मान्सूनपूर्व सक्रिय

भारतीय हवामान विभागाने (IMD) दावा केला आहे की मान्सून वारे आज संध्याकाळी 7 ते 8 वाजता केरळमध्ये दाखल होऊ शकतात. यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. केरळ व्यतिरिक्त, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील काही ठिकाणी पुढील 7 दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. यापूर्वी मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज होता, परंतु निश्चित तारखेपेक्षा 9 दिवस उशीर झाला…

Read More

करमाळा, माढ्यात पुन्हा वादळाचा हाहाकार‎:करंजे भालेवाडीत 100 एकर केळी भुईसपाट, साडेतीन कोटींचे नुकसान

दि. २ जून रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील करंजे, भालेवाडी गावातील १०० एकर केळी पिकाचे सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील काही घरावरील पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत तर लाइटचे पोल वाऱ्याने वाकलेले आहेत, तर काही ठिकाणी पडले आहेत. त्यामुळे गावातील लाइट दोन दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्याचे आंबा,…

Read More