वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….