Headlines

‘कांतारा’ थाटात अवतरला वराहदेव:मार्कंडेय शोभायात्रेत भूतकोला नृत्याचा थरार; एलईडी दृश्यांनी नगरकर मंत्रमुग्ध‎

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत श्री एकदंत गणेश मित्र मंडळ आणि शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या भूतकोला नृत्याने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘कांतारा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कर्नाटकातील पारंपरिक लोककलेच्या धर्तीवर वराह रूपम, गुलिगा देव आणि भूतकोला नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दहा कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे मिरवणुकीला थरारक आणि अद्भुत स्वरूप…

Read More

रामदेव यांनी रक्षाबंधना निमित्त कंगनाला पाठवले मिठाई-पैसे:म्हणाले- वाद मिटवा; कंगना म्हणाली- सणाला चुकभूल माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

रक्षाबंधनानिमित्त योगगुरु बाबा रामदेव यांनी अभिनेत्री तथा खासदार कंगना रनोट यांना मिठाई आणि भेटवस्तू पाठवली. त्यांनी एका लिफाफ्यात 500 रुपयांच्या नोटांची गड्डीही पाठवली. यावेळी रामदेव म्हणाले की, नात्यांमध्ये गोडवा कायम राहिला पाहिजे आणि जुने मतभेद विसरून प्रेमाने पुढे गेले पाहिजे. रामदेव म्हणाले की, देशात कोणत्याही कारणाने द्वेष आणि एकमेकांबद्दल वैरभाव नसावा. ते म्हणाले की, गेल्या…

Read More

सोनई, बेलवंडीत गुटखा विक्रेत्यांवर छापे:89 हजार रुपयांचा माल जप्त

सोनई आणि बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने २७ ऑगस्ट रोजी अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर ५ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण ८९ हजार ३६६ रुपये किमतीचा गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून ८ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शब्बीर महेताब सय्यद (वय ४५, रा. सोनई, ता….

Read More

‘रिल’च्या जमान्यात भक्तीगीतांतून संस्कारांची सुरेल वाट!:अहमदनगर एज्युकेशनच्या ‘भक्ती सुमन’ स्पर्धेत 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

भक्ती म्हणजे केवळ देवाचे नामस्मरण नसून मनात चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी शक्ती आहे. हीच भक्ती सुंदर स्वरातून व्यक्त झाली की त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. विद्यार्थ्यांना भक्तीगीतांच्या माध्यमातून संस्कृती, संत परंपरा आणि अध्यात्मिक वारशाशी जोडण्याचे काम या स्पर्धेतून झाले, असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. अहमदनगर…

Read More

Odisha Flood Crisis & UP Rain Alert; Weather Forecast India 2026

नवी दिल्ली/भोपाळ/लखनऊ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपी, बिहारसह देशातील 4 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील 47 शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये 67,000 हून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत, तर हवामान विभागाने शुक्रवारी राज्याच्या उत्तर आणि किनारी भागांमध्ये 2 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू…

Read More

मार्कंडेय रथोत्सवाने अहिल्यानगर शहर दुमदुमले:पद्मशाली संस्कृतीचा जागर; शोभायात्रेत कोलावू, फुगडी, लेझीम, टिपरी अन् मल्लखांबाची प्रात्यक्षिके‎

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाच्या वतीने श्री मार्कंडेय रथोत्सव पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी मैदान येथील ऐतिहासिक श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर ‘मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात’ शोभायात्रेला प्रारंभ झाला. सजवलेल्या रथात मार्कंडेय महामुनींची पालखी तसेच महादेवाच्या पिंडीला कवटाळून बसलेल्या…

Read More

नाशिक-पुणे रेल्वेच्या शिर्डी मार्गाला "राज' मान्यता:रेल्वे मंत्रालयाचे राजपत्र जारी, संगमनेरऐवजी नव्या मार्गाची निश्चिती‎

उत्तर-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या बहुचर्चित नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी भारत सरकारच्या ६ ऑगस्टच्या राजपत्रामध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. विशेष म्हणजे ६ ऑगस्टलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली व ६० दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले. एकीकडे अधिसूचना तर दुसरीकडे समिती, यावरून सध्या…

Read More

ॲड. रियाज पठाण खून प्रकरण:सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, पुरावे न मिळवता‎ आल्याने पाच निर्दोष‎

नेवासे येथील ॲड. रियाज पठाण खून खटल्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी निकाल देत सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. १६ सप्टेंबर २०१३ रोजी नेवासे तहसीलच्या आवारात ॲड. पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. १३ वर्षानंतर या खटल्याचा निकाल आला. खटल्यात सरकार पक्षातर्फे…

Read More

मुंबईत दूध ₹100 च्या वर, घाऊक भाव ₹9 ने वाढले:दही-पनीरचे दरही वाढू शकतात; चारा आणि वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम

सणासुदीच्या हंगामापूर्वी मुंबईकरांना महागाईचा धक्का बसला आहे. बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशन (BMPA) ने घाऊक दुधाच्या दरात प्रति लिटर ₹9 वाढ जाहीर केली आहे. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होतील. यानंतर मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधील घाऊक दुधाचा भाव ₹93 वरून ₹102 प्रति लिटर होईल. हे नवीन दर पुढील 6 महिने म्हणजेच 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू…

Read More

वैजापूरला तिघांवर गुन्हा दाखल:जांबरगावच्या कारखान्यामधून 13 टन स्टील, 20 हजार लिटर केमिकल जप्त

समृद्धी महामार्गापासून काही अंतरावर जांबरगाव शिवारातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये नेमके काय सुरू होते, याचे गूढ वैजापूर पोलिसांच्या कारवाईनंतर अधिकच गडद झाले आहे. सुरुवातीला संशयित डांबर कारखाना म्हणून समोर आलेल्या या ठिकाणातून आता १३ टन चोरीचे लोखंडी स्टील आणि २० हजार लिटर केमिकलचा साठा बाहेर आला आहे. पोलिसांनी एकूण १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More