Headlines

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या आरोपीने गुन्हा कबूल केला:शरीफुल इस्लामने कोर्टात नरमाईची विनंती केली, पोटात अडकला होता चाकूचा तुकडा

सैफ अली खानवरील हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने आपला गुन्हा कबूल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याने न्यायालयाला नरमाईने वागण्याची विनंतीही केली आहे. त्याचे वकील विपुल दुशिंग यांनी याची पुष्टी केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, न्यायालयाने फिर्यादी पक्षाला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे आणि सुनावणी 11 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 16 जानेवारी 2025 च्या मध्यरात्री सैफच्या…

Read More

मनोज जरांगे पाटलांचे 11वे आमरण उपोषण सुरू:म्हणाले- जीवघेणा लढा सुरू, तीन वर्षे वेळ दिला, आता अंमलबजावणीशिवाय माघार नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11वे आमरण उपोषण सुरू केले आहे. “जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती…

Read More

नाशिकमधील कुंभमेळ्यात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार:संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले- मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची डिग्री द्यावी लागेल

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसह शहरातील रस्त्यांची अवस्था आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आणि मेळाव्याला नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करत, “९९ टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या,” असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. कुंभमेळ्यात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार नाशिकमधील भ्रष्टाचारावर…

Read More

कुंभमेळ्याच्या तयारीवर फडणवीसांचा मोठे विधान:नाशिककरांच्या सध्या शिव्या खाव्या लागतायत, पण कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील; पृथ्वीराज चव्हाणांवरही पलटवार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच…

Read More

शेवगाव:वृक्षांना राख्या बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

रक्षाबंधन हा केवळ बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण न राहता निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ करण्याचा संदेश देणारा ठरला. तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वड, पिंपळ, कडुनिंब, अशोक आदी वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ‘वृक्षांचे रक्षण करा, वृक्ष आपले रक्षण करतील’ हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. यावेळी…

Read More

प्रशासनाचा दणका!:3400 निवडणूक गणना पत्रके परस्पर झेरॉक्स करणाऱ्या सूरज पाटीलवर गुन्हा दाखल; 5 BLO निलंबित

निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली गणना पत्रके अनधिकृतरीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ३ हजार ४०० फॉर्म्सची झेरॉक्स काढणाऱ्या सूरज पाटील याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ५ बीएलओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे…

Read More

गणेशोत्सवाची तयारी:सात्रळच्या बाप्पांची परगावी ‘क्रेझ’; 70 % मूर्ती विकल्या

सुनील सात्रळकर | सात्रळ गणेशोत्सव जवळ आल्याने येथील मूर्ती कारागिरांची गणेशमूर्तींवर रंगरंगोटी, सजावट आणि अंतिम हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. तयार केलेल्या मूर्तींपैकी सुमारे ७० टक्के मूर्तींची विक्री झाली असून उर्वरित मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देखण्या मूर्ती, आकर्षक रंगसंगती आणि सुंदर सजावटीसाठी सात्रळ येथील उपाध्ये बंधूंचा मूर्ती कारखाना परिसरात प्रसिद्ध…

Read More

रहमानच्या गाण्याने कठीण काळात अभयला दिला आधार:म्हणाला- मला स्वप्ने विकायची आहेत, आता माझी भूक वाढली

अभिनेता अभय वर्मा आपल्या करिअरच्या नव्या टप्प्याबद्दल उत्साहित आहे. ‘लईकी लईका’ मध्ये राशा थडानीसोबत दिसणारा अभय ही एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी असल्याचे सांगतो. त्यात ॲक्शन देखील आहे. तर ‘दिलकशी’ मध्ये हंसल मेहता आणि लिजो जोस पेल्लीसेरी यांसारख्या दिग्गजांसोबत काम करणे आणि एआर रहमानचे संगीत मिळणे त्यांच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. वाढत्या महिला चाहत्यांना ते…

Read More

ढगांची हुलकावणी; पिकांची करपणी!:सोयाबीन, मूग, उडीद धोक्यात, कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी‎

जामखेड तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. जूनअखेरीस आणि जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग, उडिद यांसह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला काही दिवस रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी उभारी घेतली; मात्र त्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. जामखेड तालुक्यातील सोयाबीनचे आगार…

Read More

चांदी या आठवड्यात ₹2,738 ने स्वस्त, ₹2.44 लाखांवर आली:सोने ₹1,042 ने घसरून ₹1.60 वर आले; आपल्या शहरातील दर जाणून घ्या

सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा दर 2,738 रुपयांनी घसरून 2.44 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी 2.47 लाख रुपयांवर होता. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,620 रुपयांवरून घसरून 1,59,578 रुपयांवर आला आहे. म्हणजेच, त्याची किंमत 1,042…

Read More