पोलिस श्वानांसाठी फडणवीसांचा संवेदनशील निर्णय:दहा वर्षांच्या निष्ठेची परतफेड; निवृत्तीनंतरही मिळणार आपुलकीची साथ
पोलिस दलासाठी अनेक वर्षे निष्ठेने आणि धाडसाने सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस दलात सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांना आता इतरत्र दत्तक देण्याऐवजी पोलिस विभागासोबतच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या भोजनापासून ते दैनंदिन देखभालीपर्यंतचा संपूर्ण खर्च गृहविभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे पोलिसांसोबत…