Headlines

नागपूरमधील नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी:ई-मेलने खळबळ, बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

नागपूरमधील काही नामांकित शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. वर्धमाननगर येथील सेंटर पॉईंट स्कूलसह डीपीएस आणि पोद्दार यांसारख्या शाळांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनामध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाळांची तपासणी केली. या तपासणीत अद्याप…

Read More

दूध-बर्फ पुरवठादारांची तब्बल 3.68 कोटींची फसवणूक:सात संचालकांविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल

दूध आणि बर्फाचा पुरवठा करणाऱ्या 16 व्यावसायिकांची तब्बल 3 कोटी 68 लाख 52 हजार 859 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या डेअरीशी संबंधित संचालकांनी पुरवठादारांची बिले न देता त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. तसेच पैसे मागितल्यानंतर धमकी दिल्याचाही…

Read More

Maharashtra Players & Coach Honored with National Sports Awards 2025

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 23 खेळाडू आणि प्रशिक्षकांचा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्र . मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व 23 खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. विविध क्रीडा…

Read More

सातारा पालकमंत्रिपदाचा फैसला कुणाच्या बाजूने?:शंभूराज देसाईंनी टोलवला चेंडू फडणवीस-पवारांच्या कोर्टात

सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना मंत्री शंभूराज देसाई यांनी सावध भूमिका घेत नवे वळण दिले आहे. साताऱ्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकमंत्रिपदावर कोणताही थेट दावा न करता त्यांनी निर्णयाची संपूर्ण जबाबदारी…

Read More

कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ या विधानावर बाबा रामदेव संतापले:म्हणाले- त्यांचे तारुण्य आणि पूर्वीचे पराक्रम कसे होते?; हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण

योगगुरु बाबा रामदेव यांनी जेन Z (Gen Z) बद्दल कंगना रणौतच्या ‘जनरेशन गटर’ या विधानावर टीका केली. ते म्हणाले की, देशातील तरुणांना ‘गटर जनरेशन’ म्हणणे हे वाईट मानसिकता दर्शवते. टीव्ही 9 भारतवर्षसोबतच्या संवादात बाबा रामदेव यांनी जेन Z बद्दल कंगनाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “त्यांची पात्रता काय आहे? त्यांचे बालपण कसे होते? त्यांचे तारुण्य कसे…

Read More

पुण्यात खड्ड्याने 11 वर्षांच्या ऋषभचा जीव घेतला:दुचाकी घसरली अन् मागून आलेल्या ट्रकखाली चिरडला, भीषण अपघात CCTV मध्ये कैद

रस्त्यांवरील खड्डे आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय ऋषभ संदीप पाटोळे याचा जागीच मृत्यू झाला. वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला ऋषभ मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला….

Read More

कंगना सिद्धिविनायकाच्या चरणी:गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला; मुंबा देवीचेही दर्शन घेतले, फोटो पहा

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्या. त्यांनी मंदिरात भगवान गणेशाचे दर्शन घेतले, पूजा-अर्चा केली आणि तिथे काही वेळ घालवला. मंदिर दर्शनादरम्यान कंगना पिवळ्या साडीत दिसल्या, ज्यावर सोनेरी काठ होता. त्यांनी यासोबत मॅचिंग ब्लाउज आणि नारंगी-सोनेरी रंगाचा दुपट्टा परिधान केला होता. लाल टिकली, साधे दागिने आणि कमीत कमी मेकअप करून…

Read More

'तुम्हाला बीफ आवडले का?':केरळमध्ये प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री मालविका शर्मा अस्वस्थ झाली, म्हणाली- मी शाकाहारी आहे

अभिनेत्री मालविका शर्मा नुकतीच केरळमध्ये एका रिपोर्टरच्या प्रश्नामुळे अस्वस्थ झाली, जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला बीफ आवडले का. त्यावर अभिनेत्री म्हणाली की ती शाकाहारी आहे. रिपोर्टरच्या प्रश्नावरून सोशल मीडियावर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली. खरं तर, अभिनेत्री मालविका शर्मा तिच्या आगामी ‘खलिफा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केरळमध्ये मीडियाशी बोलत होती. याच दरम्यान तिला विचारण्यात आले की…

Read More

मुंबईत 10 कोटींचा चरस जप्त:वांद्रे टर्मिनसजवळ संशयिताला अटक, 10 किलो 10 ग्रॅम अंमली पदार्थ ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मोठी कारवाई करत सुमारे १० कोटी ९ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल १० किलो १० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात…

Read More

देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार?:'त्यांना तिकडे का पाठवताय…'; मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचे मिश्किल उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असून ते दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत उघडपणे भाष्य केले असून, नुकतेच भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत झालेले संघटनात्मक बदल आणि त्यानंतर फडणवीसांचा पार पडलेला दिल्ली दौरा यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस…

Read More