Headlines

गैरवर्तन करताना तरुणीचा विरोध म्हणून भोंदूने दोघांनाही संपवले:साक्रीतील दुहेरी हत्याकांड; भोंदूबाबा योगेश खैरनारने दिली कबुली

नोकरीत स्थिरता आणि आणि कुटुंबाच्या सुखासाठी मित्र-मैत्रिणीने अमावास्येला पूजा केली. त्यानंतर त्या तरुणीला सोडण्यासाठी जात असताना भोंदूबाबाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने गळा आवळून खून केला. तर दुसरीकडे, अक्षय या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यालाही संपवले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. साक्री तालुक्यातील कासारे गावातील रहिवासी असलेल्या…

Read More

कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५ हजार क्षमतेचे स्टेडियम आहे, जिथे कबड्डीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामने होतात.आता गावच्या महिलाही दिवाळीला माहेरी जाण्याऐवजी गावात होणाऱ्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेणे पसंत करतात. गावातील जवळपास प्रत्येक घरात एक कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीने येथील तरुणांच्या…

Read More

मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे

महामहेश्वर मंदिर… महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते. सिम्बायोसिसमधून उच्च शिक्षण घेतलेल्या एका ‘योगी’ महाराजांच्या मार्गदर्शनात येथे तरुण आपले भविष्य घडवत आहेत. मंदिरातील देणगी, महाराजांना मिळणारी दक्षिणा विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुस्तकांवर खर्च होते. योगी सिद्धनाथ महाराज आणि या मंदिराची देखभाल करणाऱ्या ‘श्री शेषनाथ संस्थान’चे…

Read More

नेदरलँड्सने भारताला 1000 वर्षांपूर्वीचे ताम्रपट परत केले:सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 38 झाली, 18 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. नेदरलँड्सने भारताला 11 व्या शतकातील ताम्रपट परत केले 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान भारताला अधिकृतपणे 11 व्या शतकातील ऐतिहासिक चोळ वंशाचे ताम्रपट म्हणजेच शिक्के आणि नाणी परत करण्यात आली. राष्ट्रीय (NATIONAL) 2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च…

Read More

कॅफेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी;भुसावळमध्ये तरुणीचे धर्मांतर अन् निकाह:आरोपीस अटक, मूळची मध्य प्रदेशातील पीडिता आजी-आजोबांकडे राहायची

कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित नबिल कासम शेख (रा. भुसावळ) याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली पीडिता भुसावळमध्ये आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीत असताना…

Read More

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, हरित इमारत तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या इमारतीमध्ये प्रत्येक आमदाराला तब्बल १ हजार चौरस फुटांचे आधुनिक घर मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवासाचे…

Read More

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात घोषणा:नियमात बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्रे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीबाबत कॅबिनेट उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आम्ही प्रशासनाकडून काही अतिरिक्त आणि सविस्तर माहिती मागवली आहे. ती माहिती हाती येताच…

Read More

संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा

‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण…

Read More

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…

Read More