Headlines

Admin

लोकप्रतिनिधी तात्पुरते, अधिकारी कायमचे; जनतेची कामे वेळेत करा:पाटोद्यात महसूल समाधान शिबिर; सभापती सचिन गरड यांचे आवाहन‎

लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसत . आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

सत्ताधारी आमदारांचा घरचा आहेर; सरकारच्या समित्या कागदावर:आ. वाघ, फरांदे, हिरे यांनी काढले शासनाचे वाभाडे; ‘झिरो टॉलरन्स’ची घोषणा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक असलेल्या ‘विशाखा’ व ‘पोश’ समित्या नाशिकमध्ये केवळ नावापुरत्याच असल्याचे वास्तव समोर आले असून, यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय कार्यालयांपासून खासगी कंपन्यांपर्यंत नियमांचे पालन होत नसल्याने महिलांना तक्रार करण्यासाठी विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप बैठकीत केला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत आमदार चित्रा वाघ, देवयानी फरांदे आणि सीमा…

Read More

‘हे रीलस्टार नव्हे, गुंड आहेत’; छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा गर्दीसमोर दम:‘हवा’ करणाऱ्या गुंडांवर पोलिस भारी; गोळीबार करणाऱ्या पीडी टोळीची धिंड

दोन दिवसांपूर्वी हनुमाननगरात गावठी कट्टा आणि बिअरची बॉटल नाचवत गोळीबार करणाऱ्या पवन दिवेकर व त्याच्या पीडी कंपनीवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. गुंडांवर पोलिस कसे भारी पडतात, याचा प्रत्यय शनिवारी (१८ एप्रिल) रात्री आला. अवघ्या ४८ तासांपूर्वी ज्या चौका . गुंड जेलमधून सुटल्यावर शस्त्रांसह रील्स बनवून दहशत माजवत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. यानंतर ॲक्शन…

Read More

New threat of humid heat; Heatstroke possible within hours, even moderate temperatures can be fatal

Marathi News National New Threat Of Humid Heat; Heatstroke Possible Within Hours, Even Moderate Temperatures Can Be Fatal नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतात ‘दमट उष्णता’ हवामान बदलाचे सर्वात धोकादायक रूप बनत चालली आहे. हे वाढते तापमान व जास्त आर्द्रता यांचे असे समीकरण आहे, ज्यामध्ये शरीर घामाच्या माध्यमातून स्वतःला थंड करू शकत नाही. जर्नल क्लायमेट…

Read More

तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी

पंचवटीत अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचे तसेच तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तोडून टाकत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तांजिर इनामदारची २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेची २०२४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तांजिरशी ओळख झाली. त्याने लॉजमध्ये दारू पाजून अत्याचार केला. गजवा-ए-हिंद करायचे म्हणत तिला धर्मांतरासाठी धमकावले….

Read More

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत:त्यांना या विषयातले काय कळते? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंची टीका

लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले. मात्र, राज ठाकरेंच्या…

Read More

मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मे पासून कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील

फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा या वर्षी मे महिन्यात सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखत आहे. 2022 च्या अखेरीस आणि 2023 च्या सुरुवातीला झालेल्या पुनर्रचनेनंतर कंपनीचे हे सर्वात मोठे पाऊल असेल. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणावर होणारी ही कर्मचारी कपात 20 मे च्या आसपास सुरू होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात मेटा आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांपैकी…

Read More

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश

अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा…

Read More

वर्धा देशात 'हॉटस्पॉट'!:45 अंश सेल्सिअस तापमानासह जिल्हा अक्षरशः होरपळला, सूर्याचा प्रकोपाने रस्ते ओस

उष्णतेच्या लाटेने वर्धा जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून शनिवारी तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशात सर्वाधिक तापमान नोंदवल्यामुळे वर्धा हॉटस्पॉट ठरला असून ‘रवी’च्या प्रखर तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडलेले दिसत असून नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. उकाड्याचा फटका सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या नागरिकांना…

Read More

काँग्रेसचे 'सृजन अभियान' चांदूरबाजार, तिवस्यात; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड:आमदार भाई जगताप व आफताब अहमद निरीक्षक म्हणून उपस्थित

काँग्रेसने शहर आणि जिल्हा स्तरावर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत चांदूरबाजार आणि तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद आणि प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप यांनी निरीक्षक म्हणून या सभांना उपस्थिती लावली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शहर…

Read More