बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू
विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…