Headlines

Admin

आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर:MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे; वानखेडेवरील फोटोवरही स्पष्टीकरण

ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार…

Read More

ट्रेलर लॉन्च दरम्यान रितेश देशमुख भावुक:वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर, पतीला भावुक पाहून जेनेलियाचे डोळेही भरून आले

मुंबईत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रितेश देशमुख भावुक झाले. मंचावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या भूमिकेबद्दल बोलताना ते थांबले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी त्यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढली, ज्यामुळे वातावरण भावुक झाले. रितेश म्हणाले की, ही भूमिका त्यांच्यासाठी केवळ एक रोल नसून अभिमान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की, ‘छत्रपती…

Read More

न्यायाधीशांना खटल्यातून बाजूला करण्याची केजरीवाल यांची याचिका फेटाळली:न्यायमूर्ती स्वर्णकांता म्हणाल्या- मी बाजूला झाले तर संदेश जाईल की दबाव टाकून न्यायाधीशांना हटवू शकतात

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित असलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ती याचिका फेटाळून लावली आहे, ज्यात न्यायाधीशांनी या प्रकरणातून बाजूला व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती स्वर्णकांता म्हणाल्या, ‘मी या प्रकरणातून स्वतःला वेगळे करणार नाही. मी सुनावणी करेन. जर मी बाजूला झाले, तर असा संदेश जाईल की…

Read More

पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी:पुणे-जबलपूर रेल्वेही नियमित होणार, प्रवाशांची प्रतीक्षा संपली

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून…

Read More

संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज:उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

बनावट एटीसी परवानग्यांचा पुण्यात महाघोटाळा उघड:विमान अपघाताचा धोका; विकासक-अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुणे शहरात बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना…

Read More

पुणे बालपुस्तक जत्रा 30 एप्रिलपासून:गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे 4 मे पर्यंत विनामूल्य आयोजन

पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा विनामूल्य भरवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती मिळावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा…

Read More

युवक काँग्रेसकडून ‘पाच अभियानां’ची घोषणा:सामाजिक तणाव, जातीय प्रश्न, अंधश्रद्धेविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम

युवक काँग्रेसने राज्यात ‘पाच अभियानां’ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली…

Read More

कौटुंबिक वादाचा भीषण अंत:लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी मारली; परिसरात खळबळ

लातूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटनांची मालिका सुरूच असून, चाकूर येथील 6 वर्षीय चिमुरड्याचा त्याच्याच चुलतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकामागून एक घडलेल्या या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती…

Read More

संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-2026 ची घोषणा:जीव वाचवणाऱ्यांचा हेल्प रायडर्सतर्फे सन्मान होणार

हेल्प रायडर्स संस्थेने ‘संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६’ ची घोषणा केली आहे. मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुढाकार घेतलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आणि इतर…

Read More