Headlines

Admin

महात्मा फुले यांना ‘द्विशताब्दी’ जयंती वर्षानिमित्त भारतरत्नने सन्मानित करा:सर्वशाखीय माळी संघ ऋणानुबंधचा बैठकीत ठराव‎

सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम जयंती साजरी करणारे महामानव, आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समतेचा पाया घालणारे, सर्वासाठीच शिक्षणाची कवाडे खुली करणारे आद्य शिक्षण तज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी, . महात्मा फुले यांनी या देशातील सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनीही महिलांच्या शिक्षणाचा विडा उचलला….

Read More

चिखलदऱ्यात पर्यटनाचा पहिला विकेंड; सुरक्षेसाठी 200 पोलिस:धोकादायक सेल्फी आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार करडी नजर

14 दुचाकीद्वारे राहणार सतत गस्त‎ . विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरम्यान पावसाळ्यातील शासकिय सुटी व विकेंड अर्थात शनिवारी, रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. यातच चिखलदरा व परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ व ५ जुलै हा पहिलाच विकेंड आहे. यातच चिखलदरा येथे मागील काही तासांपासून सुरू असलेला सततधार पाऊस…

Read More

आलियाबादऐवजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच ‘जीएमसी’ व्हावे:आमदार संजय खोडके यांची पुन्हा एकदा मागणी‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा वन विभागाच्या अखत्यारीतील ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जागा बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली. आमदार खोडके म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर…

Read More

Aamir Khan Wedding Invite Snub for Phogat Family; Geeta to Marry Wyatt

हिसार4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. पण या लग्नाचे फोगाट कुटुंबाला निमंत्रण मिळाले नाही. यामुळे दंगल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रथमच फोगाट कुटुंब आमिर खानच्या वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही. आमिर खान स्वतः गीता फोगाटच्या कौटुंबिक कार्यक्रमात आला होता. आमिरने मुलगी इरा खानच्या लग्नातही फोगाट कुटुंबाला निमंत्रण पाठवले…

Read More

माळशिरसमध्ये एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती:हरित वारी उपक्रमात 6 शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग‎

प्रतिनिधी | अकलूज पर्यावरण संवर्धनासाठी माळशिरसमध्ये हरित वारी उपक्रमांर्गत जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलिस ठाणे आणि से ट्रीज कंपनी व ‘ दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल…

Read More

विठ्ठल मंदिरातील मूर्तींची आजपासून प्राणप्रतिष्ठा:जतन व संवर्धन विकास आराखड्यानुसार कामे, औसेकर महाराज म्हणाले, वारकऱ्यांना यंदा सुखद अनुभूती

. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ४ व ५ जुलै रोजी विधीपूर्वक संपन्न होणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले…

Read More

आता ज्वेलर्सकडेही जमा करता येणार सोने:बँकांशिवाय नवीन कलेक्शन पार्टनर बनतील, नवी सुवर्ण मुद्रीकरण योजना आणण्याचा प्लॅन

आता तुम्ही तुमचे सोने बँक लॉकरप्रमाणे ज्वेलर्स (सराफा व्यापारी) यांच्याकडेही जमा करू शकाल. सूत्रांनुसार, सरकार पुढील दोन आठवड्यांत एका नवीन आणि अद्ययावत ‘गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम’ (GMS) ची घोषणा करू शकते. नवीन योजनेत देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना ‘कलेक्शन पार्टनर्स’ म्हणून समाविष्ट केले जाऊ शकते. यामुळे ते सामान्य लोकांमधून सोने जमा करू शकतील. यापूर्वी फक्त बँकांनाच सोने जमा…

Read More

सासवड माळी एज्युकेशन सोसायटीत आर्थिक कारभारातून उफाळला वाद:चौकशीसाठी संचालकांचे पाचव्या दिवशीही धरणे आंदोलन‎

माळीनगर येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावरून संस्थेमध्ये वाद निर्माण झाला असून, काही संचालकांनी विविध मागण्यांसाठी सलग आठ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची धर्मादाय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, संस्थेच्या प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून…

Read More

कचरा टाकणाऱ्यांना दंड करा- आ. जगताप:कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ मनपा अधिकारी उतरणार रस्त्यावर

शहरातील सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे साचलेले ढीग, विस्कळीत पाणीपुरवठा अशा नागरी समस्यांवर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (३ जुलै) महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत नगरसेवक व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचना न ऐकणार्‍या कर्मचार्‍यांच्या बिनपगारी करण्याच्या सूचना दिल्या. आमदार जगताप यांच्या सूचनेनंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीचे वरिष्ठ…

Read More

अहिल्यादेवींचे विचार आचरणामध्ये आणा:"अहिल्यानगर' नाव सार्थ करा, आ. संग्राम जगतापांच्या उपस्थितीत ''आनंदतीर्थ'' ॲप लाँच‎

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, संस्कृती, निष्ठा आणि चारित्र्य येथील प्रत्येक नागरिकाच्या आचरणात दिसू लागले, की ‘अहिल्यानगर’ हे शहराचे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, तर स्वैराचार, क्रूरता, आक्रमण आणि धर्माच्या नावाखाली खोटे काम करणाऱ्या प्रवृत्तींना विरोध आहे, असा संदेश उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज यांनी दिला. राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांच्या समाधी सान्निध्यात…

Read More