Headlines

Admin

टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन‎

टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…

Read More

समाधानकारक पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या:शेतकरी तयारीत व्यस्त, मूर्तिजापूर तालुक्यात तुरळक पावसावर कपाशीची टोचणी सुरू‎

मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवस आलेल्या पावसाने सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग देत आहेत.शेतांमध्ये ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी,पट्टीपास, सऱ्या पाडणे, बांध दुरुस्ती आदी…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी

राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक…

Read More

जिल्हा परिषदेच्या 137 शाळा जर्जर, तर 230 वर्गखोल्या धोकादायक यादीमध्ये:उन्हाळ्याची सुटी संपली तरी इमारतींची दुरवस्था कायमच‎

. शिक्षण विभागाने बऱ्यापैकी गाजावाजा करीत मंगळवारी ३० जून रोजी निवडक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे समारंभ आयोजित केले आहेत. परंतु व्यापक प्रमाणातील वास्तविक चित्र मात्र काही वेगळेच आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतील अनेक शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अत्यंत नादुरुस्त व जर्जर अवस्थेत पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी वर्गांची छते गळत असून, भिंतींना मोठे तडे गेले आहेत….

Read More

14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी‎

सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Read More

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संत्रा, मोसंबी उत्पादक:कलमा तयार, 365 शासनमान्य नर्सरी, समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा‎

सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबूची कलमे विक्रीसाठी तयार झाली आहेत. आता लागवडीसाठी अनुकूल आणि दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादक शेतकरी करत आहेत. पाऊस चांगला झाल्यानंतर राज्यासह राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात कलम खरेदीसाठी येतात. शेंदूरजनाघाट परिसर संत्रा कलम उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. तिवसाघाट, सातनूर,…

Read More

महसूल अधिकारी थेट बांधावर; आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन:सेलू येथील बीबीएफ पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक‎

वाशी तालुक्यातील सेलू येथील ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. सिरसावाड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे आवाहन केले. सिरसावाड पाटील यांनी केवळ…

Read More

आंबे गावात विजेच्या धक्क्यातून पतीला वाचवताना पत्नीचाही अंत:वटपौर्णिमेदिवशीच घाला, माेटार सुरू करण्यासाठी गेला होता शेतकरी‎

प्रतिनिधी | आंबे सात जन्माच्या सोबतीचे व्रत असणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशीच आंबे गावात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना सोमवारी घडली. सकाळच्या सुमारास शेती पंपाची मोटर बंद करताना विजेचा धक्का लागलेल्या पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत मोटारीला चिकटलेल्या पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीलाही विजेने कचाट्यात घेतल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या सणादिवशी सकाळच्या प्रहरी ६.३०…

Read More

नागरिकांचा प्रश्न:कुर्डुवाडीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट आरोग्य सभापतींची मोहीम ‘नव्याचे 9 दिवस’

शहरातील वाढती रहदारी पाहता प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असले, तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या थातूरमातूर कारवाईनंतर ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर नाहीतर थेट रहिवाशांच्या वसाहतींमध्ये ठाण मांडून बसलेली दिसून येत आहेत. दुसरीकडे, प्रशासन मात्र एखादी-दुसरी जुजबी कारवाई करून आपलीच पाठ थोपटून घेण्याचे काम करत असल्याचा संतापजनक आरोप…

Read More