Headlines

राज्यात पावसाचा हाहाकार!:धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी नदीनाल्यासह धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अशातच उजनी धरणात देखील मोठ्याप्रमाणत पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे भीमा नदीने देखील इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. अशातच…

Read More

सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू ‎नका

मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे…

Read More

विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ!:सायबर जनजागृतीसाठी पोलिसांनी राबवला अनोखा उपक्रम‎

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळे येथील ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न…

Read More

मनपातर्फे शहरात डेंगूमुक्त अभियानाला सुरुवात:श्रमिकनगरमध्ये डेंगू जनजागृतीचा प्रभावी उपक्रम, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन‎

अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथे ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा’ शुभारंभ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानांतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती बारस्कर म्हणाल्या, आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात….

Read More

कर्जमाफी यादीत घोळ; तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष:तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन, माफ केलेल्या रकमेत तफावत‎

राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत प्रचंड तफावत असल्याचे समोर आले असून, एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध रास्त…

Read More

चोपड्यात बापाचे अमानुष कृत्य:पोटच्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, 12 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, 10 वर्षांचा मुलगा गंभीर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्याच दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 12 वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून, 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष भिलाला असे या बापाचे नाव असून, तो अवघ्या आठ दिवसांपूर्वीच कारागृहातून…

Read More

बँक शाखेचे उद्घाटन:नव्या सहकार कायद्याने शेतकरी, महिला, तरूणांचे सक्षमीकरण, सहकारमंत्री पाटील यांचे प्रतिपादन‎

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिक, तरुण व महिलांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन व सर्वसमावेशक सहकार कायदा आणणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केली. सहकारमहर्षी डॉ. वामनरावजी कोरपे यांच्या पुण्यदिनानिमित्त अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतनीकृत सिव्हिल लाइन शाखेच्या (एडीसीसी) उद्घाटनाप्रसंगी…

Read More

राजापेठ पोलिसांनी पकडले 41 लाखांचे एमडी; 1 अटकेत:महिनाभरापासून पोलिस मागावर : अकोलीत कारवाई‎

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोली मार्गावर पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाकडून तब्बल २७७ ग्रॅम (किंमत ४१.५५ लाख रुपये) एमडी जप्त केली आहे. याचवेळी दहा लाखांची कार असा सुमारे ५१.५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १) रात्री आठ ते सव्वा आठ वाजताच्या सुमारास झाली. साहिल राजेश मेहरा (२२, रा. शिवाजी संकुल,…

Read More

साईचरणी जमा होणाऱ्या दानातून फुलतेय जनसेवा:भाविकांच्या देणगीची रक्कम गरजूंसाठी आरोग्य अन् शिक्षणाच्या रूपात होते खर्च

“सबका मालिक एक’ आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचा सेवेचा मंत्र जपत शिर्डी संस्थानचे कार्य अविरत सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातील भाविकांनी साईचरणी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले. मात्र, हे दान केवळ संस्थानच्या तिजोरीत पडून न राहता, त्यातून सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि…

Read More

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत पुणे, फलटण-बारामतीचे संघ विजयी:10 जिल्ह्यांतील 85 संघांनी स्पर्धेत घेतला सहभाग,पारितोषिकांचे केले वितरण‎

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय‌ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष . स्पर्धेत बॅडमिंटन (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे, बॅडमिंटन (मुली) गटात कृषी महाविद्यालय, फलटण, टेबल टेनिस (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे,…

Read More