Headlines

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली….

Read More

डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु, टीव्ही, संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम आले तसे मुलेही मैद . आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला. सर्व मैदानी खेळ विसरून केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर दिला…

Read More

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख…

Read More

प्रवेशोत्सव:बैलगाडी अन् ट्रॅक्टरमधून नवागतांची मिरवणूक‎, सव्वा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. १५) तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित अशा एकूण ४५६ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये सजविलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर…

Read More

परिस्थिती हाताळण्यासाठी एसीपींची घटनास्थळी धाव:संभाजीनगरच्या बायजीपुरा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, आरोपीच्या अटकेसाठी घाटीत जमाव

मासे विक्रीसाठी दुकान लावण्याच्या कारणावरून बायजीपुऱ्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी रात्री घाटीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताचे नातेवाइक, मित्र असा मोठा जमाव घाटीत जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलगांनी घेतली. शाहरुख शकील खान (३०) असे मृत तरुणाचे नाव…

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:18 जूनला मतदान, प्रशासनाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदारसंघात निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता…

Read More

आकांक्षा फाउंडेशन मॉडेल मनपा शाळांत राबवणार:प्रति विद्यार्थी खर्च कमी, शिक्षणाची गुणवत्ता वाढणार

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’चे शैक्षणिक मॉडेल राबवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर यांनी याबाबत माहिती दिली. या मॉडेलमुळे प्रति विद्यार्थी खर्च कमी होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असा दावा करण्यात आला आहे. आकांक्षा फाउंडेशन पुणे शहरात अनेक वर्षांपासून शाळा चालवत आहे. सध्या या संस्थेमार्फत सुमारे…

Read More

बीजेएसचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी आधार:पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अमरावतीत भावपूर्ण निरोप

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली पुनर्वसन प्रकल्पात नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात आला आहे. १५ जून २०२६ पासून सुरू झालेल्या नवीन सत्रासाठी पुण्याला रवाना होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना अमरावती येथे एका भावपूर्ण निरोप समारंभात निरोप देण्यात आला….

Read More