Headlines

'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना वाळेकर यांनी ‘आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, हे चालणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत आमदारांवर टीकास्त्र सोडले. यासोबतच, अंबरनाथ नगरपालिकेत आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी,…

Read More

Maharashtra PMFBY Crop Insurance Deadline Extended Till August 10

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ला मुदतवाढ दिली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मूळ अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याने आता ही मुदत 10 ऑगस्टपर . पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा, तर कर्ज न…

Read More

मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के

राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळविला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वात कमी 73.99 टक्के काम झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ता. 8 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण…

Read More

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवणे ही काँग्रेसची परंपरा:उबाठा आता राहुल गांधींच्या तालावर नाचतोय, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही काँग्रेसची परंपरा होती ती आता उबाठाकडून चालू ठेवण्यात आली आहे. त्यांचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावर उबाठा गट चालवत आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी जे सांगतील तसे उद्धव ठाकरे बोलतात आणि वागतात हे महाराष्ट्र बघतो आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सक्षमपणे चालवत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले…

Read More

राज्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू:नियम मोडल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद; बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित होताच, राज्यात धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ अधिकृतपणे लागू झाला आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे राज्यात उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या नव्या कायद्यातील कडक तरतुदींनुसार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या…

Read More

सेनगाव-रिसोड मार्गावर उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून अपघात:पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सेनगाव ते रिसोड मार्गावर वाढोणा शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांच्या मृतदेहावर रविवारी ता. 2 सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील सुमारे 200 पेक्षा अधिक कामगार कामाच्या निमित्ताने…

Read More

32 हजार काेटींच्या निधीतून नाशिकचा कुंभ भव्य-दिव्य हाेणार:दिव्य मराठी आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिशा स्पष्ट

सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या अध्यात्म, संस्कृती, सनातन परंपरेचे जागतिक दर्शन घडविणारा महाउत्सव आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपासून होणाऱ्या सिंहस्थासाठी शासन कोणतीही तडजोड करणार नाही. 32 हजार कोटी रुपयांच्या निधीतून ‘दिव्य कुंभ, भव्य कुंभ, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ’ घडविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार!:धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी नदीनाल्यासह धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अशातच उजनी धरणात देखील मोठ्याप्रमाणत पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे भीमा नदीने देखील इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. अशातच…

Read More

सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू ‎नका

मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे…

Read More

विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ!:सायबर जनजागृतीसाठी पोलिसांनी राबवला अनोखा उपक्रम‎

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळे येथील ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न…

Read More