Headlines

ऑपरेशन टायगरला ठाकरे सेनाच जबाबदार:प्रतापराव जाधवांचा दावा, खासदारांमध्ये असंतोष असल्याचा गौप्यस्फोट

‘ऑपरेशन टायगर’वर केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड असंतोष धुमसत असल्याचा दावाही…

Read More

देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!:ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎

अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, येथील ऐतिहासिक वास्तू आणि असामान्य सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. भूषण देशमुख यांनी वर्ष २०१६ पासून अविरतपणे दर रविवारी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबवला. हाच वारसा पुढे अखंड सुरू ठेवण्यासाठी, याप . येथील ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात रविवारी सकाळी भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स‌ चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स‌् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह‎

तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स‌् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…

Read More

सामाजिक संस्थांना शासनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी:संस्थापक रवींद्र बोडखे यांचे मंत्री सावे यांना निवेदन‎

सामाजिक संस्थांना शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळावे. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवावी. हा विषय राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. निवेदन सादर केले. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी मंत्री सावे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या विविध समस्यांवर राज्यपाल, सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री…

Read More

ग्रामीण महाराष्ट्राची तहान भागणार; 2027 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी:ड्रोन-रोबोटिक्स क्षेत्रासह वैद्यकीय प्रकल्पासंबंधित निर्णयांनाही मंजुरी

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आता शुद्ध आणि नियमित पाण्याचा प्रवाह अखंड राहणार आहे. राज्यातील जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र ग्रा . ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या संकल्पनेला गती देत, २०२७ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले आहे. याशिवाय…

Read More

संभाजीनगरात तिरंगी लढत:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान; 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड,…

Read More

दिव्य मराठी एक्सपाेज:17 तलावांचा गाळ कागदोपत्री काढून 5.32 कोटी रुपये हडपले, धाराशिवला गाळमुक्त धरण योजनेत घोटाळा

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील 17 पाझर तलावांतून गाळ उपसा न करताच बोगस कागदपत्रे तयार करुन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून 5 कोटी 31 लाख 75 हजार रुपये हडपले. माहिती अधिकारात हे समोर आले आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. ज्या पाझर तलावातून गाळ उपसा केल्याचे दाखवले आहे, त्या तलावात काटेरी झुडपे वाढली…

Read More

"ही कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली योजना", राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप:जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफीची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या चांदूर रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट…

Read More

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सर्व सेवा ठप्प:अमरावतीत कार्यालयासमोर निदर्शने; राज्यभरातील 945 कर्मचारी सहभागी

मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अमरावती येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सर्व सेवा मंगळवारपासून ठप्प झाल्या आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी नागरिकांना कोणतीही कागदपत्रे किंवा सेवा मिळाली नाही. शासनाने या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांसह सामान्य नागरिकांकडूनही होत आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आरटीओ कार्यालयासमोर शासनाविरुद्ध निदर्शनेही…

Read More

'तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या':माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत…

Read More