Headlines

खासदारांचा अपमान आणि शिवीगाळ चुकीची:संजय राऊतांवर शिरसाटांचा पलटवार, म्हणाले- नाराजी आजची नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य बंडाच्या चर्चांदरम्यान खासदार संजय राऊत यांनी संशयित बंडखोर खासदारांवर केलेल्या टीकेनंतर आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, खासदारांना शिवीगाळ करणे आणि त्यांचा अपमान करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही पाहिलंच असेल की संजय…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला:‘गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार- जैनमुनी नीलेशचंद्र

मुंबईत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी जैन मुनींसाठी अनेक सोसायट्यांत तसेच फूटपाथवर पांढरे पट्टे रंगवले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू नीलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनी ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी चालणार’, असे…

Read More

डॉ. सुधा कांकरिया यांना मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार:सांस्कृतिक मंत्री शेलार‎यांच्या हस्ते गौरव‎

बालरंगभूमीवर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने आपल्या सेवाकार्याद्वारे अमूल्य योगदान देणाऱ्या अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि…

Read More

वडीलांच्या खून खटल्याचा निकाल बाजूने लावतो, पक्षात या,ओमराजे निंबाळकरांवर दबाव:संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. या प्रकरणी निकाल तुमच्या बाजूने लागावे असे वाटत असेल तर आमच्या गटात या असे ओमराजे निंबाळकर यांना आज दिल्लीत आलेल्या एका नेत्याने म्हटल्याचे सांगितले आहे. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम…

Read More

दिलासा:भीमा नदीवरील कोंढार चिंचोली- डिकसळ 55 कोटींच्या पुलाच्या कामाला अखेर वेग

करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान भीमा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर वेग आला असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर पुलास मंजुरी मिळून जवळपास ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र, उजनी जलाशयातील पाणीपातळी कायम उच्च राहिल्यामुळे…

Read More

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः उभे राहून अधिकाऱ्यांना टेपने रस्त्याची मोजणी करायला लावली. या मोजणीत अपघातग्रस्त विहिरीचा भाग भूसंपदनात येत असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना…

Read More

ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही:उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांवरही पलटवार

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा…

Read More

जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधीक्षकांना घेराव, ‘बफर स्टॉक” खुला करा;‎जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ‎

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम . यावेळी शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक तात्काळ खुला करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा…

Read More

शहरात दुपारी मान्सूनपूर्व‎वादळी पावसाची हजेरी‎:मान्सूनचे आगमन 22 जून नंतर होण्याची शक्यता‎

शहरात मंगळवार १६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मान्सुनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला वादळाचा जोर असला तरी नंतर मात्र तो ओसरला. सुमारे ३० मिनिटे तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. शहरात आजवर सायंकाळी वादळी पाऊस हजेरी लावत होता. परंतु, आज प्रथमच दुपारी पाऊस आल्याने कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी ऐनवेळी त्यांच्याकडे असलेल्या…

Read More

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर…

Read More