Headlines

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या‎:सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा, नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

चांदवड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन पुढील पाच दिवसांत न दि . नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊन-वारा-पाऊस असताना देखील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र, या…

Read More

पळसवाडीत शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारला शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता:प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार‎

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे प्रशासन, आमदार-खासदारांकडे मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर स्वावलंबनाचा मार्ग निवडत कोणत्याही लोकप् . पळसवाडीतील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी वर्षानुवर्षे बिकट वाट तुडवावी लागत होती. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन वाहतूक ठप्प…

Read More

रोटेगाव एमआयडीसीचे 2 फलक संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकले:संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याने विरोध

रोटेगाव औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला वेग देण्यासाठी एमआयडीसीने भूखंड नोंदणी व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मोजणीसाठी नुकतेच मुंबईतील एमआयडीसीचे अधिकारी परिसरात दाखल झाले असता प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा झाले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले असून शेतकऱ्यांनी रात्री एक महिन्यापूर्वी उभारलेले एमआयडीसीचे दोन फलक उखडून फेकले आहेत. १९९३ मध्ये…

Read More

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे त्याचे वडील सुखदेव ओहळ या…

Read More

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप; शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या नागरिकांनी आज, बुधवारी अमरावतीत तीव्र रोष व्यक्त केला. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या संयुक्त महामोर्चाचे नेतृत्व खासदार बळवंतराव वानखडे, विद्यापीठ ऑफीसर्स फोरमचे डॉ. नितीन कोळी, रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा. जगदीश गोवर्धन, प्रा. बंडू गवई आणि नयन मोंढे…

Read More

शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन:योजनेतील अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ नाही, आरोप

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत, शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,…

Read More

पार्वतीनगर 'डक फूट बेन्ड' दुरुस्ती अंतिम टप्प्यात:आज सकाळी चाचणी, उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत

अमरावती येथील पार्वतीनगर परिसरातील नागरिकांना लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. जलकुंभाच्या ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, आज (गुरुवारी) काही प्रमाणात तर उद्या (शुक्रवारी) पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून ‘डक फूट बेन्ड’ला गळती लागल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम…

Read More

तुकाराम मुंढे यांची बदली करू नका:चांदूर बाजार काँग्रेसची तीन वर्षांसाठी मागणी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुढील तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी चांदूर बाजार तालुका ग्रामीण काँग्रेसने केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात गुटखा माफिया, भेसळखोर आणि बनावट औषधी रॅकेटविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. दूध, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही त्यांनी…

Read More