Headlines

हिंगोलीत एसटीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला:मालेगाव-बाळापूर प्रवासात 2.80 लाखांचे दागिने लंपास

मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधील 2.80 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 25 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव (जि. वाशीम) येथील गणेश शिंदे हेआखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे त्यांच्या…

Read More

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठीच सरकार सत्तेत का?:सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच भोंदूंची मस्ती वाढली- विजय वडेट्टीवार

राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे, आणि ते महाराजांचा अपमान करतात, असे…

Read More

लोकप्रतिनिधी कसा नसावा? हे गायकवाड यांनी दाखवून दिले:शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सत्यजित तांबे यांनी साधला निशाणा

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या वादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कसा नसावा यावरही चर्चा सुरू करून दिली, असा सनसनीत टोला आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधताना हाणला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून…

Read More

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More

बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र ‘जोडेमारो’ आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत

आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव…

Read More

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी

संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच…

Read More

पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा…

Read More

सरकीचे पोते असलेला ट्रक उलटल्याने क्लिनर जखमी:मोर्शीजवळ दोन अपघात; अन्य एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर‎

मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर आज, शनिवारी सकाळी झालेल्या रस्ता अपघातात आयशर ट्रक उलटला. या अपघातात सरकी रस्त्यावर विखुरली. क्लिनरलाही जीव वाचविताना पायात जखम झाली. दुसऱ्या एका घटनेत मोर्शी-चांदूरबाजार रोडवरील रेल्वे गेटजवळच्या गतिरोधकावर वाहन अनियंत्रित झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीहून छत्तीसगढ येथे सरकीचे पोते असलेला आयशर ट्रक उलटून ट्रकची…

Read More

देशभरातून 80 हजारांहून अधिक प्रवेशिका:4 गटातून सिटी, स्टेट, राष्ट्रीय स्तरावर निवड, ‎ क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धा ज्युनिअर एडिटर निकाल जाहीर; विजेत्यांचा केला सत्कार

. देशातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धा दैनिक भास्कर ज्युनियर एडिटर-८ च्या निकालानंतर विजेत्यांच्या सत्काराचा शुभारंभ करण्यात आला. अकोला येथील दैनिक दिव्य मराठी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला देशभरातून ८० हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. ए, बी, सी आणि डी गटांत सिटी, स्टेट आणि नॅशनल स्तरावर…

Read More