Headlines

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. रविवार, २६ एप्रिल रोजी राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी…

Read More

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नका . इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या…

Read More

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल उभारून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकला असता. मात्र, त्याच जागेवर कचरा डेपो सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा नवीन कचरा डेपो राजापेठ पोलीस ठाणे, मनपाचे व्यापारी संकुल आणि झोन कार्यालयाच्या अगदी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More

पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर

पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात…

Read More

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर तिखट हल्ला:सपकाळ म्हणाले – ढोंगी बागेश्वरला संत परंपरेशी जोडताना फडणवीसांना लाज वाटली पाहिजे

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ढोंगी बागेश्वर बाबाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. धीरेंद्र…

Read More

अमेरिका आता स्वतःच 'नरक' बनलीये:डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलवरील गोळीबारानंतर प्रियंका चतुर्वेदींचा बोचरा टोला, नेमके काय म्हणाल्या?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुक्कामाला असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’साठी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया हॉटेलमध्ये उपस्थित असतानाच बॉलरुमच्या वरच्या मजल्यावर हा गोळीबार झाला. या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी…

Read More

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’च्या वापराचा उल्लेख बंधनकारक – मंत्री झिरवाळ

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन…

Read More