Headlines

आता फुटण्याचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचा का?:शशिकांत शिंदे म्हणाले – तो प्रश्न सोडून द्या, भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील

“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही थेट निशाणा…

Read More

नागपुरात डिजिटल करन्सी घोटाळ्याचा 500 कोटींचा डाव उधळला:दोन मुख्य सूत्रधार जेरबंद, अब्जावधींची फसवणूक टळली

नागपुरात ‘फ्री कॉईन’ आणि ‘मर्चंट कॉईन’ या डिजिटल करन्सीच्या नावाखाली २५ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे या महाठगांचा तब्बल १० लाख २४ हजार युजर्सकडून ५०० कोटी रुपये उकळण्याचा डाव फसला असून, अब्जावधी रुपयांची संभाव्य फसवणूक टळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून मिहुल…

Read More

रहाटगावात संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन:आकाश लक्षणे महाराजांच्या वाणीतून अधिक मासानिमित्त कथा संपन्न

अमरावती नजीकच्या रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्यावतीने अधिक मासानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद् भागवताचार्य, वाणीभूषण गुरुवर्य ह.भ.प. श्री आकाश लक्षणे महाराज यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न झाली. कथेच्या समारोपात महाराजांनी परीक्षित राजाला मिळालेला शाप आणि श्रीमद् भागवत कथेचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, महाभारताच्या…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:काँग्रेसला मोठा धक्का, 96 नगरसेवकांनी 'व्हीप'चे उल्लंघन करत केले मतदान

अमरावती प्रतिनिधी | अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा ‘व्हीप’ जारी केला असतानाही, अमरावती आणि तिवसा वगळता इतर ठिकाणच्या ९६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हीप) दिला होता. मात्र, १२०…

Read More

ग्रामपंचायत निवडणूक रद्द करा; सरपंच संघाची मागणी:आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने कायदेशीर पेच

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच ताजा असतानाच, आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाने’ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल….

Read More

भंडारा-गोंदिया, नागपुरात विधान परिषदेसाठी 100% मतदान:नागपुरात एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; 22 जूनला मतमोजणी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि नागपूर येथे मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांत लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावल्याने तब्बल १०० टक्के मतदानाची नोंद झाली. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या जागांवर यापूर्वीच अविरोध निवड झाल्याने, संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूर आणि भंडारा-गोंदियाच्या लढतीकडे लागले होते. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात…

Read More

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक:महायुती एकसंघ, विरोधकांचीच मते फुटतील – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

महायुतीचे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदान घेऊन भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त करताना महाविकास आघाडीचेच मतदार फुटण्याची खात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. आज दुपारी सातारा येथे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानाची पाहणी करण्यासाठी उमेदवार धैर्यशील कदम…

Read More

ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना तातडीने 'Y+' सुरक्षा:संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'च्या इशाऱ्यानंतर गृह विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

शिवसेना शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ६ खासदारांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या थेट इशाऱ्याची गंभीर दखल घेत, गृह विभागाने या सर्व बंडखोर खासदारांना तातडीने…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांकडून आंतरजिल्हा दरोडेखोर टोळी जेरबंद:एका रात्रीत पाच दरोडे, 20 गुन्हे उघड; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड, बारामती, जुन्नर आणि आसपासच्या परिसरात दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत टोळीतील तिघांना अटक केली असून, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे २५ लाख…

Read More