Headlines

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक),…

Read More

ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल‎

जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता पाहता अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मका, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. त्यामुळे आ . जालना तालुक्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने खरीपाचे मोठे नुकसान केले असले तरी रब्बीला मोठा फायदा झाला आहे. पाणीपातळीत झालेल्या…

Read More

खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा आता वाचला जात आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रक . तपासातील महत्त्वाचे मुद्दे गूढ ‘रिंग मेकर’ घटनास्थळावरून बोटांच्या अंगठीचे माप घेणारी ३५ गोलाकार स्टीलची मापे जप्त…

Read More

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts

Marathi News National Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस…

Read More

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषद उमेदवारीचा पेच!:नीलम गोऱ्हे अन् बच्चू कडूंना पक्षांतर्गत तीव्र विरोध; नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू असल्या तरी, संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून…

Read More

आठवडी बाजार बंद करून भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!:अंबादास दानवेंचा आरोप, संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज शहानुरवाडी येथे तीव्र निदर्शने केली. हा निर्णय रद्द करून गरिबांचा रोजगार वाचवावा, या मागणीसाठी ‘चला रे चला… बाजाराला चला’…

Read More

मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते…

Read More