Headlines

'तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या':माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत…

Read More

तरुणच कॉकरोच होऊन भ्रष्ट सिस्टीम साफ करतील:संविधान चौकातून अभिजित दीपके यांचा सरकारला इशारा

नागपूर येथील संविधान चौकात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पक्षाचे मुख्य संयोजक अभिजित दीपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने लीक होत असल्याने गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. दीपके…

Read More

शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा:जमिनीच्या कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत, शासनाचे नवे धोरण जाहीर

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, आता कुटुंबातील जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोटहिस्सा अवघ्या 200 रुपयांत केली जाणार आहे. जमीन मोजणीच्या प्रक्रियेतील विलंब आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या…

Read More

'अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ':कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. कर्जमाफीचे नेमके स्वरूप आणि निकष ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफी जाहीर…

Read More

'सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा बाहेर येणार नाही':नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन; सैताने गावात तणाव

राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आक्रमक पावलामुळे प्रशासनासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी या विहिरीतून बाहेर येणार नाही…

Read More

देशाचा विकासदर 2.7 टक्केच, सरकारी आकडेवारी खोटी:7.7 टक्के विकासदर चुकीचा, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा दावा

भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक आकडेवारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्र सरकारकडून सादर केला जाणारा देशाचा विकासदर ७.७ टक्के नसून, तो केवळ २.७ टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा सिन्हा यांनी केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित ‘आजची भारतीय अर्थव्यवस्था’ या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राला…

Read More

Shirdi Sai Trust Income Sees Dip; Asset Donations Rise in FY 2025-26

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत रोख रकमेसह सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात सढळ हाताने दान अर्पण करून आपली इच्छापूर्ती . शिर्डी येथी साईबाबा ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले…

Read More

'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हत्पा खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित…

Read More

पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?:तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; सरनाईक म्हणाले- आम्ही स्वागतच करू!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तब्बल 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे या चर्चांना आता शिंदे गटातील इतर नेत्यांच्या वक्तव्यांचीही जोड मिळाल्याने ‘ऑपरेशन…

Read More

दिव्य मराठी विशेष‎:एसटीची 10% हंगामी भाडेवाढ महिनाभर कायम, डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे दिले कारण

उन्हाळी सुट्ट्या संपल्या तरी लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणारा कात्रीचा विळखा तूर्तास कायम राहणार आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बससेवांसाठी लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एक महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुधारित वाढीव भाडेदर १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत…

Read More