Headlines

गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी‎

गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती,…

Read More

वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य:निषेध करून तहसीलदारांना दिले निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा आरोप करत समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने तहसीलदार अंकिता दहिभाते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा…

Read More

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा…

Read More

लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांवर नजर:बाजार समिती परिसरात कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, गुन्हेगारीला आळा बसणार‎

मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे येथील चोऱ्या, गुन्हेगारीचे चित्रीकरण फुटेज थेट पोलिसांच्या तपासकामासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडून संपूर्ण अडत व्यापार पेठेत चहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कचऱ्याची घंटागाडी 1 मेपासून रोज येणार; संकलनाची वाहने आता 350 वरून 477

घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक प्रकल्पाचे काम आता १ मेपासून सुरू करण्याचा मुहूर्त निघाला आहे. अहमदाबादच्या ‘वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी हे काम दिले आहे. या कंत्राटानुसार ४७७ कचरा संकलन वाहनांचा ताफा उतरणार आहे. त्यामुळे आता रोज कचरा संकलन केले जाईल. पूर्वी ३५० वाहनांतून कचरा संकलन केले जात होते….

Read More

काॅर्पाेरेट जिहाद:‘क्रोनोलॉजी’ उघड; 4 संशयितांना कोठडी, शिरखुर्म्यातून नशा, ब्लॅक मॅजिकचाही दिला सल्ला

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील चार संशयितांना बुधवारपर्यंत (२९ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी, रझा रफिक मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ‘इनकॅमेरा’ झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. जिहाद प्रकरणात एका पुरुषाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सातव्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांना…

Read More

आधी दैवी शक्तीचा बागुलबुवा:आता स्मृतिभ्रंशाचे करतोय नाटक, भोंदू खरातविरोधात 19 वा गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरात (६७) याला रविवारपर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी त्याला ऑनलाइन हजर करण्यात आले होते. दरम्यान, सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या राइट हँड ललित पोफळे यालाच खरातने तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खरातविरोधातील दाखल झालेला हा १९ वा गुन्हा आहे….

Read More

पुण्यात गोळीबाराचा थरार!:वारजेतील सलूनमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार, दोन जण जखमी; परिसरात खळबळ

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आज सायंकाळी 8 च्या सुमारात वारजे परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. येथील एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमींना…

Read More

चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव

ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…

Read More

धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन: 'चारपैकी एक मूल संघाला द्या':लोकसंख्या वाढीच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

नागपूर येथे बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी देशभक्तीचा संदेश देताना ‘चार मुले जन्माला घाला आणि त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारा उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिर’च्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शास्त्री यांनी…

Read More