Headlines

नांदूर मधमेश्वरमधून 18,403 क्युसेकने आवक:गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात केवळ 10 मिलीमीटर पावसाची नोंद‎

पैठण नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होईल,…

Read More

सीमाप्रश्नी बैठकीनंतर पवारांची शिंदेंसाेबत बंद दाराआड चर्चा:30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस पवार हजर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ३० वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड २० मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. पवारांचे एकनाथ…

Read More

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, काँग्रेसचा प्रशासनाला इशारा:कंपन्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास 'जोडे मारा' आंदोलन

तिवसा, प्रतिनिधी: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना इशारा निवेदन सादर करत, संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास ‘जोडे मारा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस बियाण्याचे पोते ठेवून आपला तीव्र निषेध नोंदवला. निकृष्ट…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी:चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस

अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण असले तरी, १४ पैकी केवळ सहा तालुक्यांनीच सरासरी पावसाची नोंद ओलांडली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ८८.९ टक्क्यांवर आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण…

Read More

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने…

Read More

शिंदेंना निमंत्रण नाही, मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद:सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुर तर्फे शेवाळा या गावांमध्ये शेतखरडणी अनुदान वाटपात गैरव्यवहार करून शासनाची ६.१५ लाख फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी तारीख 8 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पिंपरी कृष्णापुर तर्फे शेवाळा व अन्य एका गावामध्ये सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडणीचे अनुदान मंजूर…

Read More

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', प्रमोद सावंत यांची घोषणा, प्रवासासाठीही आर्थिक मदत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र,…

Read More

क्रांतिकारी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार:मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी पूजा चव्हाण; राज्यभर संघटनात्मक बांधणीला गती

पुण्यातील कोथरूड येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र करण्याचा एकमुखी निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीचे अभियान सुरू करायचे आहे, त्याविषयी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीत राज्यातील काही प्रमुख…

Read More

नांदेड पोलिसांची धडक कारवाई:सराईत चोरट्याकडून 15 दुचाकी जप्त, 6 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड शहर व जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजने…

Read More

पुण्यात 8 ते 11 जुलैदरम्यान जड वाहनांना प्रवेशबंदी:पालखी सोहळ्यानिमित्त जुना मुंबई-पुणे महामार्ग 9 जुलैला बंद

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्र येत आहेत. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक व्यवस्थापन लागू केले आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप…

Read More